शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

सिक्कीममध्ये सेंद्रिय भाज्यांचे ८० हजार टन झाले उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:02 IST

संपूर्ण सेंद्रिय राज्य म्हणून घोषित झालेल्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याने २०१६-१७ या वर्षात सेंद्रिय भाज्यांचे तब्बल ८० हजार टन उत्पादन केले आहे.

गंगटोक : संपूर्ण सेंद्रिय राज्य म्हणून घोषित झालेल्या ईशान्येकडील सिक्कीम राज्याने २०१६-१७ या वर्षात सेंद्रिय भाज्यांचे तब्बल ८० हजार टन उत्पादन केले आहे. मात्र शेतक-यांच्या मालाला अधिकाधिक किंमत मिळावी यासाठी मार्केटिंग नेटवर्क उभे करण्याची गरज आहे.सिक्कीमच्या फळबागा आणि नगदी पीक विकास विभागाचे सचिव खोर्लो भुतिया यांनी सांगितले की, आमची बांधिलकी प्रदर्शित करण्यासाठी आम्ही गेल्या वर्षी ८० हजार टन सेंद्रिय भाज्यांचे उत्पादन केले. या भाज्या १०० टक्के रसायनमुक्त असून, १४ हजार हेक्टर क्षेत्रावर त्या पिकविण्यात आल्या. ‘मिशन आॅरगॅनिक व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट’ने ईशान्य भारतात एकूण ७६ हजार ३९२ हेक्टर शेतजमीन सेंद्रिय शेतीसाठी निश्चित केली आहे.भुतिया म्हणाले की, एवढे उत्पादन होऊनही राज्याला भाजीपाल्याची स्वत:ची गरज पूर्णपणे भागविता आलेली नाही. स्वयंपूर्णतेसाठी १ हजार टन भाज्यांची तूट राहिली. मिशनची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करून स्वयंपूर्णतेचे उद्दिष्ट गाठले जाईल. त्यासाठी उरलेली शेतजमीन वापरली जाईल.पहिल्या टप्प्यात सेंद्रिय शेतीसाठी १४ हजार हेक्टर क्षेत्र वापरण्यात आले. या मिशनअंतर्गत मालाचे उत्पादनोत्तर व्यवस्थापन, ब्रँडिंग आणि मार्केटिंग या बाबी २०१८ पर्यंत पूर्ण केल्या जातील. सरकारने मिशनचे व्यवस्थित नियोजन केले आहे. मिशनमध्ये २८ संघटनांचे २४ हजार शेतकरी सहभागी झाले आहेत. एकूण ४१ क्लस्टर्समध्ये विविध सेंद्रिय पद्धतीने पिके घेण्यात आली, असे ते म्हणाले.त्यांनी सांगितले की, शेतकºयांना उत्पादित मालाची अधिकाधिक किंमत मिळावी, त्यासाठी मार्केटिंग नेटवर्क उभे करण्याची गरज आहे. त्यासाठी इफ्कोसोबत संयुक्त उपक्रम हाती घेतला आहे. इफ्को ही देशातील सर्वात मोठी शेतकरी सहकारी संस्था आहे. सिक्कीम-इफ्को संयुक्त उपक्रमांतर्गत पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत एकात्मिक प्रक्रिया प्रकल्प उभा करण्यात येईल. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन लाभ (इन्सेंटिव) दिला जात आहे. शेतकºयांना ई-व्हाऊचरच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट केले जात आहे. (वृत्तसंस्था)फळे आणि धान्येही-या वर्षात सिक्कीममध्ये १०० टन चेरी आणि १०० टन सेंद्रिय किवी फळे उत्पादित करण्यात आली. पथदर्शक प्रकल्पांतर्गत मोठी इलायची, अद्रक, हळद, हिरण्य गहू यांचेही उत्पादन घेण्यात आले.

टॅग्स :organic vegetablesसेंद्रिय भाज्या