शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata Death: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

सिंग असे काही करतील हे अविश्वसनीय

By admin | Published: March 11, 2015 11:56 PM

कोळसा खाणपट्टा वाटप घोटाळ्यात सीबीआय विशेष न्यायालयाने आरोपी करून समन्स बजावल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन

नवी दिल्ली: कोळसा खाणपट्टा वाटप घोटाळ्यात सीबीआय विशेष न्यायालयाने आरोपी करून समन्स बजावल्यानंतर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी ‘अखेर सत्य बाहेर येईल व माझे निरपराधित्व सिद्द होईल’, असा विश्वास व्यक्त केला तर काँग्रेसनेही सर्व शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे जाहीर केले.सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल वृत्तवाहिनीस प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘ मनमोहन सिंग काही गैर किंवा भ्रष्ट कृती करतील यावर भारतात कोणीही विश्वास ठेवेल, असे मला वाटत नाही. ते नेहमीच सावध असायचे व कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची ते काळजी घ्यायचे. आम्ही (काँग्रेस) सर्व शक्तीनिशी त्यांचा बचाव करू. काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनीही हिच भावना व्यक्त करताना म्हटले की, डॉ. मनमोहन सिंग हे कमालीची सचोटी आणि नितीमत्ता असलेली व्यक्ती आहेत.पक्षाचे आणखी एक प्रवक्ते संजय झा यांनी टिष्ट्वटरवर अशी प्रतिकिया टाकली,‘ (सत्ताधाऱ्यांच्या ) आनंदात मिठाचा खडा टाकतो आहे याबद्दल क्षमस्व, पण न्यायालयाने समन्स काढले म्हणून कोेणी दोषी ठरत नाही. कायद्याचे हे अगदी प्राथमिक तत्व आहे. बरोबर की नाही? संजय झा यांनी असेही म्हटले की, त्यांनी (डॉ. मनमोहन सिंग) पारदर्शकतेचा आग्रह धरला, पण भाजपाशासित राज्यांनीच त्याला विरोध केला होता. वस्तुस्थिती अशी आहे की, त्या काळात जे काही वादग्रस्त कोळसा खाणपट्टे वाटप झाले ते सर्व मध्य प्रदेश, छत्तीसगढ, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल इत्यादी काँग्रेसची सत्ता नसलेल्या राज्यांतच झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)