शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'मोदी... मोदी... Yes पापा, एनी डेव्हलपमेंट NO पापा', देशाची सत्य परिस्थिती हीच',

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 11:09 IST

मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

ठळक मुद्देमोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला

मुंबई -  केंद्र सरकारने तीन नवीन कृषी विधेयकांना संसंदेच्या दोन्ही सभागृहात मंजुरी दिली आहे. मोदी सरकारच्या या विधेयकांना काँग्रेससह इतरही अनेक पक्षांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी या विधेयकांना मोठ्या प्रमाणात विरोध केला असून शेतकरी मोदी सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात लहानांपासून ते वृद्धांपर्यंत अनेकजण सहभागी होताना दिसत आहेत. अशाच एका आंदोलनातील चिमुकल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत पंजाबमधील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच, अकाली दलाच्या नेत्या आणि खासदार हरसीमरत कौर यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही दिला आहे. पंजाबमधील काँग्रेससह अकाली दलानेही मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध करत, शेतकऱ्यांच्या बाजुने आंदोलन उभारले आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये या विधेयकाचा विरोध होत असून शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत. मध्य प्रदेशमध्येही काही प्रमाणात मोदींच्या या कृषीविषयक धोरणाला शेतकरी संघटना व राजकीय पक्षांनी विरोध दर्शवला आहे. 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका चिमुकलीचा फोटो शेअर केला आहे. या चिमुकलीच्या हातात मोदींचे चित्र असलेला कागद असून त्यावर एक कविता लिहिलेली आहे. जॉनी.. जॉनी.. एस पापा या कवितेचं हे विडंबन असून मोदींवर गोड शब्दात टीका करण्यात आली आहे. दिग्विजय सिंह यांनी हा फोटो शेअर करत, सध्या देशातील मूळ परिस्थिती हीच, नर्सरी स्कुलच्या या कवितेतील ओवींप्रमाणेच असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे.     

कृषी कायद्याला विरोध, देशाचे नुकसान 

"मी तुम्हाला विचारू इच्छितो, हे कायदे या संकटाच्या काळातच का लागू केले गेले? एवढी घाई कशाची होती? कारण मोदीजींना माहीत आहे, की शेतकरी आणि मजुरांच्या पायावर कुऱ्हाड मारली, की ते घरातून बाहेर निघू शकणार नाहीत. नरेंद्र मोदी केवळ ही व्यवस्था नष्ट करत आहेत. जेथे त्यांनी MSPची हमी द्यायला हवी, तेथे ते या तीन कायद्याच्या माध्यमाने शेतकरी आणि मजुरांना मारत आहेत. त्यांचा गळा कापत आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना दोनच पर्याय उपलब्ध असतील. ते म्हणजे, अडानी आणि अंबानी. आता आपणच सांगा, एक शेतकरी त्यांच्याशी लढू शकतो? त्यांच्याशी बोलू शकतो? मुळीच नाही, सर्व काही नष्ट होईल. हेच मोदींचे लक्ष्य आहे. येथे मी केवळ शेतकऱ्यांसाठीच उभा नाही, तर भारतातील सर्व जनतेसाठी उभा आहे. कारण केवळ शेतकरी आणि मजुरांचे नाही, तर संपूर्ण देशाचे नुकसान होत आहे," असेही राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकारFarmerशेतकरीDigvijaya Singhदिग्विजय सिंह