शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
3
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
4
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
5
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
6
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
7
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
8
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
9
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
10
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
11
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
12
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
13
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
14
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
15
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
16
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
18
घटनास्थळी दहशतीच्या खुणा, रस्त्यांवर शुकशुकाट, लष्कराची वर्दळ, हल्ल्यानंतर पहलगाममध्ये आहे अशी परिस्थिती
19
Pahalgam Attack Update : "इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
20
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!

‘मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती चिंताजनक, हिंदू होडीमधून करताहेत पलायन’, ममता बॅनर्जी सरकारवर चौफेर टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 11:33 IST

Murshidabad Violence Update: केंद्र सरकारने नुकत्याच पारित करून घेतलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात देशातील काही भागात विरोध होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, संतप्त जमावाने जाळपोळ, दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.

केंद्र सरकारने नुकत्याच पारित करून घेतलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात देशातील काही भागात विरोध होत आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून, संतप्त जमावाने जाळपोळ, दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. तसेच या हिंसाचारादरम्यान, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुर्शिदाबादमध्ये परिस्थिती तणावपूर्ण असून, या हिंसाचारावरून भाजपाने राज्यातील ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसेच येथील भयावह परिस्थितीमुळे अनेक हिंदू कुटुंब पलायन करत आहेत, असा आरोपही केला आहे.

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील काही भागात मागच्या काही दिवसांपासून वक्फविरोधात हिंसक विरोध आंदोलनं होत आहेत. यादरम्यान, हिंसक जमावाने शनिवारी पिता-पुत्रासह तीन जणांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हे पिता-पुत्र हिंदू-देवी देवतांच्या मूर्ती घडवायचे अशी माहिती समोर आली आहे, दरम्यान, हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी बीएसएफच्या आठ कंपन्या आणि सुमारे  एक हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये डीजींपासून ते एएसपी स्तरापर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

यादरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यात नवा वक्फ बोर्ड सुधारणा कायदा राज्यात लागू केला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी बंगालमध्ये हिंदू सुरक्षित नसल्याचा आणि परिस्थिती खूपच गंभीर असल्याचा आरोप केला आहे.

मुर्शिदाबाद हिंसाचारावरून सुवेंदू अधिकारी यांनी दावा केला की, धार्मिक कट्टरतावाद्यांच्या भीतीमुळे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील धुलियन क्षेत्रामधून ४०० हून अधिक हिंदूंनी आपलं घर सोडणं भाग पडलं आहे. भयग्रस्त कुटुंबांनी नदी पार करून माल्दा जिल्ह्यातील बैष्णवनगर येथील देओनापूर-सोवापूर ग्रामपंचायत क्षेत्रामधील ग्रामपंचायत क्षेत्रातील लालपूर हायस्कूलमध्ये आश्रय घेतला आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालwaqf board amendment billवक्फ बोर्डAll India Trinamool Congressआॅल इंडिया तृणमूल काँग्रेसBJPभाजपा