शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

परिस्थिती चिघळली, बांग्लादेशातील मोठ्या जमावाचा भारतात घुसण्याचा प्रयत्न; BSF ने रोखले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 22:05 IST

बांग्लादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर 4,096 किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवर 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

Bangladesh Violence : अनेक दिवस बांग्लादेशात चाललेल्या आरक्षणविरोधी आंदोलनामुळे शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन करावे लागले. सध्या देशात अंतरिम सरकार स्थापन झाले असून, उद्या नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली या अंतरिम सरकारचा शपथविधी होणार आहे. पण, बांग्लादेशातील परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. हिंसक आंदोलनांमुळे अनेकांना देश सोडावा लागत असून, जत्थेच्या जत्थे भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत. 

भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्नआज दुपारी हजारो बांग्लादेशींनी पश्चिम बंगालच्या सीमेत घुसखोरीचा प्रयत्न केला, पण बीएसएफने त्या सर्वांना रोखले. भारत सरकार परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, तसेच सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बांग्लादेशी नागरिकांचा मोठा गट आज उत्तर बंगालच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी जमला होता. हे सर्व भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण, बॉर्डर गार्ड बांग्लादेश, नागरी प्रशासन आणि बीएसएफच्या जवानांनी या सर्वांना पळवून लावले. 

भारत-बांगलादेश सीमेवर 'हाय अलर्ट'बीएसएफच्या म्हणण्यानुसार, बांग्लादेशातील घडामोडी लक्षात घेता सोमवारी 4,096 किमी लांबीच्या भारत-बांगलादेश सीमेवरील सर्व युनिट्समध्ये 'हाय अलर्ट' जारी करण्यात आला आहे. सुमारे 2200 किलोमीटर लांबीची सीमा एकट्या पश्चिम बंगाल राज्याला लागून आहे. याशिवाय बांग्लादेशची सीमा भारताच्या आसाम, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालयशीही आहे. अशा स्थितीत सीमेवर सुरक्षा वाढवणे आणि घुसखोरीचे प्रयत्न थांबवणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

हिमंता बिस्वा सरमा यांनी चिंता व्यक्त केलीआसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बांग्लादेशातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. तसेच, जर बांग्लादेशात अशीच अशांतता कायम राहिली, तर अनेकजण भारतात येतील. शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात ईशान्येतील सर्व दहशतवादी गटांचा बांग्लादेशातून खात्मा करण्यात आला, मात्र आता बांग्लादेश पुन्हा एकदा अशा दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान बनू शकते, ही आपल्यासाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशIndiaभारतBSFसीमा सुरक्षा दल