शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

सनरूफमधून डोकं बाहेर काढलं अन् झटक्यात वेगळं झालं; देहारादून अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 17:16 IST

देहरादूनमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात सहा तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Dehradun Accident: देहरादून झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण उत्तराखंड हादरले आहे. एका चौकात भरधाव इनोव्हाने कंटेनरला धडक दिल्याने सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातावेळी दोन तरुणांची डोकी कारच्या सनरूफमधून बाहेर होती. गाडीची कंटेनरला धडकताच या दोन तरुणांची मान त्यांच्या शरीरापासून वेगळी झाली. या भीषण अपघातात सहा तरुणांचा जीव गेला. तीन दिवस उलटूनही या अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याचवेळी या अपघातातून बचावलेला एकमेव जखमी तरुणही रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. 

सोमवारी रात्री उशिरा बल्लुपूर चौक-गारिकांत रस्त्यावर ओएनजीसी चौकातून जाणाऱ्या कंटेनरला सुसाट वेगाने जाणाऱ्या इनोव्हा गाडीची धडक बसली. या अपघातात तीन तरुणी आणि तीन तरुण जागीच ठार झाले. अपघातात कारचे छत तुटल्याने तरुण आणि तरुणीचे डोके धडावेगळे झाले. तर उर्वरित चौघांचे मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत मिळाले. 

मात्र, तीन दिवस उलटून गेले तरी या अपघाताबाबत कोणीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. बल्लूपूरहून गढी कॅन्टच्या दिशेने जात असताना सर्व मित्र एकत्र पार्टी करत होते आणि खूप आनंदी होते. भरधाव जाणाऱ्या कारची धडक एवढी भीषण होती की, गाडीचा चुराडा झाला आणि आत बसलेल्या तरुणांचे मृतदेहही छिन्नविछिन्न अवस्थेत सापडले आहेत. 

या घटनेबाबत सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत. इनोव्हाचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला. तरुण दारू पिऊन गाडी चालवत होते. बीएमडब्ल्यूसोबत स्पर्धा करत होते, असे विविध दावे केले जात आहेत. आता डेहराडूनचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंह यांनी हे सर्व दावे खोटे असल्याचे म्हटलं आहे. 

"आम्ही शहरातील विविध भागातील कारचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यात कार अतिशय संथ गतीने जात आहे. म्हणजे ओव्हर स्पीडिंगच्या बाबतीत तथ्य नाही. फक्त, अपघाताच्या ठिकाणी गाडीचा वेग वाढला होता. अचानक वाहनाचा वेग वाढण्यासारखे काय झाले, हा तपासाचा विषय आहे. कारच्या ब्रेकखाली पाण्याची बाटली सापडली आहे. मात्र अपघातापूर्वी ती ब्रेकखाली आली की अपघातानंतर याचा तपास करण्यात येत आहे. बीएमडब्ल्यूसोबत स्पर्धा करण्याची माहिती देखील चुकीची आहे. बाकी सिद्धेश शुद्धीवर आल्यावर कळेल. अपघाताच्या वेळी तर सनरूफवर बसले नव्हते तर कारमध्ये बसले होते. शवविच्छेदनात मद्यपान करून गाडी चालवल्याचे आढळून आले नाही," अशी माहिती अजय सिंह यांनी दिली.

दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गुनीत (१९), नव्या गोयल (२३) आणि कामाक्षी (२०) यांचा समावेश आहे. या तिन्ही मुली देहरादून शहरातील वेगवेगळ्या भागात वास्तव्यास होत्या. याशिवाय कुणाल कुकरेजा (२३), अतुल अग्रवाल (२४) आणि ऋषभ जैन (२४) अशी मृत्यू झालेल्या तीन मुलांची नावे आहेत. त्यापैकी कुणाल हा हिमाचलमधील चंबा येथील रहिवासी होता, तर उर्वरित लोक देहरादूनचे रहिवासी होते. तर सातवा तरुण सिद्धेश अग्रवाल (२५) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडAccidentअपघातPoliceपोलिस