शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

स्मॉग टॉवर्स, कृत्रिम पाऊस उपयोगी नाही! भारताच्या वायु प्रदूषणावर अमेरिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 7:10 AM

भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे अमेरिकेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे अमेरिकेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले आहे. धुक्यांचे मनोरे (स्मॉग टॉवर्स) आणि कृत्रिम पाऊस (क्लाउड सीडिंग) यासारख्या किफायतशीर तंत्रज्ञान हे देशातील प्रदूषणाच्या समस्येवर शाश्वत उपाय नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) जागतिक वायू प्रदूषण आणि आरोग्य तांत्रिक सल्लागार गटाचे सदस्य रिचर्ड पेल्टियर म्हणाले की संपूर्ण भारतात वायू प्रदूषण खरोखरच वाईट आहे, याची जाणीव आहे ही चांगली गोष्ट आहे, परंतु ते रोखण्यासाठी अचूकपणाची कमतरता आहे.

हे म्हणजे आंघोळीच्या टॉवेलने नदी कोरडे करणे!

‘स्मॉग टॉवर्स’च्या भूमिकेबद्दल विचारले असता पेल्टियर म्हणाले की हे हवा स्वच्छ करणारे हे विशाल ‘एअर प्युरिफायर’ अल्पप्रमाणात प्रदूषण कमी करतात, परंतु खर्च आणि देखभाल आव्हानांमुळे संपूर्ण शहरांसाठी अव्यवहार्य आहेत. हे म्हणजे आंघोळीच्या टॉवेलने एखादी मोठी नदी कोरडे करण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. कृत्रिम पाऊस हाही निश्चितपणे दीर्घकालीन उपाय नाही.

आयुर्मानात ५.३ वर्षे घट

स्वतंत्र विचारगट ग्रीनपीस इंडियाच्या मते देशातील ९९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या पीएम २.५ पेक्षा जास्त डब्ल्यूएचओ मानकांपेक्षा जास्त हवेत श्वास घेते.

६२ टक्के गर्भवती महिला आणि ५६ टक्के लोकसंख्या सर्वाधिक प्रदूषित भागात राहतात.

सूक्ष्म कण वायू प्रदूषण भारतात सरासरी आयुर्मान ५.३ वर्षे आणि दिल्लीत ११ वर्षांपर्यंत कमी करते.

स्वच्छ हवेसाठी अमेरिकेला लागली ५० ते ६० वर्षे

दिल्लीत वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी किती वेळ लागेल, असे विचारले असता त्यांनी अमेरिकेचे उदाहरण दिले.

अमेरिकेने १९६० च्या दशकात स्वच्छ वायू कायदा लागू केला आणि अलीकडेच देशाने चांगली मानली जाणारी हवेची गुणवत्ता विकसित केली आहे. येथपर्यंत येण्यासाठी ५० वर्षे लागली.

ही तात्कालिक समस्या नाही. हे काही एका कलमाच्या किंवा कायद्याच्या फटक्याने सोडवली जाणार नाही, असे पेल्टियर म्हणाले.

टॅग्स :pollutionप्रदूषण