शहरं
Join us  
Trending Stories
1
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
2
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
3
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
4
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
5
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
6
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
7
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
8
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
9
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
10
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
11
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
12
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
13
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
14
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
15
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
16
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक
17
Pitru Paksha 2024: महालय आणि श्राद्ध यात फरक काय? पितृपक्षात दोन्ही शब्दांचा का होतो वापर?
18
UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान! 
19
MBBS प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी बदलला धर्म; 8 जणांचा प्रवेश रद्द, प्रकरण काय?
20
"मी कचरा करणार नाही", मराठी बोलताना अमिताभ बच्चन यांच्याकडून मोठी चूक, मागितली माफी, म्हणाले...

अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत 48 भाविकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:29 PM

अमरनाथ यात्रा पार पडल्यानंतर परतीच्या वाटेवरच मध्य प्रदेशातील एका भाविकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यत यात्रेदरम्यान 48 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर,दि. 19 - अमरनाथ यात्रा पार पडल्यानंतर परतीच्या वाटेवरच मध्य प्रदेशातील एका भाविकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पोलीस अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, पवित्र अमरनाथ गुहेतील हिम शिवलिंगाचे दर्शन घेऊन पहलगाममधील नुनवान बेसकॅम्प येथे परतत असताना मंगळवारी संध्याकाळी रोमेश्वर पाटीदार यांचा मृत्यू झाला आहे.  दरम्यान, पाटीदार यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास केला जात आहे. 
 
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार,  48 दिवस चालणा-या अमरनाथ यात्रेदरम्यान आतापर्यंत एकूण 48 भाविकांचा मृत्यू झाला आहे.  यासोबत नैसर्गिक कारणांमुळे  20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर  10 जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आठ भाविकांचा मृत्यू झाला होता. तर 20 भाविकांचा मृत्यू रस्ते अपघातात झाल्याची माहिती समोर आली आहे. 
 
राज्याचे राज्यापाल एन.एन.व्होरा यांनी 29 जूनपासून सुरू झालेल्या अमरनाथ यात्रेमध्ये आतापर्यंत मृत पावलेल्या व जखमी झालेल्या भाविकांसंबंधित मिळालेल्या माहितीची मंगळवारी पुन्हा एकडा पडताळणी केली.
 
दरम्यान,  अमरनाथजी श्राइन बोर्डचे सीईओ उमंग नरुला यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना देण्यात येणारी आर्थिक मदतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात्रेदरम्यान मृत पावलेल्या भाविकांना घरापर्यंत पोहोचवण्यासाठी अमरनाथजी श्राइन बोर्डनं आतापर्यंत 14.66 लाख रुपये व 1.34 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
 
आणखी बातम्या वाचा
(पनुन काश्मीर संघटनेकडून अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा जाहीर निषेध)
 
अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांची बस रविवारी (16 जुलै ) दुपारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर नचलानात (जिल्हा रामबन) खोल दरीत पडून, दोन महिलांसह १७ जणांचा मृत्यू झाला होता. मृत भाविक उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील आहेत. ही बस जम्मू-काश्मीर परिवहन महामंडळाची होती. जम्मू येथून ३,६०३ यात्रेकरूंना घेऊन निघालेल्या ताफ्यात ही बस होती.