शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Social Media Guidelines: ...तर काय उद्यापासून देशात फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम बंद होणार? नवे नियम लागू करण्याची मुदत आज संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 11:09 IST

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 रोजी सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता.

नवी दिल्ली - देशात सुरू असलेल्या सोशल मिडिया कंपन्या अर्थात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामसमोर मोठी समस्या निर्माण होऊ शकते. केंद्र सरकारने देशात काम करत असलेल्या सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यासाठी तीन महिन्यांची वेळही दिली होती. ही वेळ आता 26 मेरोजी पूर्ण होत आहे. मात्र, अद्याप कुठल्याही कंपनीने या नियमांचे पालन केलेले नाही. त्यामुळे, 26 मेनंतर भारतात फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मिडिया साइट्स बंद होतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Social Media Guidelines will facebook instagram twitter and other social media platforms cease to operate in india from may 26)

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी, 2021 रोजी सर्वच सोशल मिडिया कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. सोशल मीडिया कंपन्यांना भारतात, कंप्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते आणि त्या सर्वांचे कार्यक्षेत्र भारतात असणे अनिवार्य केले होते. यात, तक्रार निवारण, आक्षेपार्ह कंटेटवर लक्ष ठेवणे, कंप्लायंस रिपोर्ट आणि आक्षेपार्ह कंटेंट हटविणे आदी नियम आहेत.

महात्मा गांधीसह अनेक नेत्यांचे आक्षेपार्ह फोटो वापरून बदनामी; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सोशल मिडिया कंपन्यांना आपली वेबसाइट अथवा मोबाइल अॅपवर फिजिकल कॉन्टेक्स पर्सनची माहिती द्यावी लागेल, असेही या आदेशात म्हणण्यात आले होते. आतापर्यंत केवळ कू नावाची कंपनी वगळता इतर कुठल्याही कंपनीने यांपैकी कुठल्याही अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नाही.

भारतात काम करण्यासाठी अमेरिकेकडून हिरवा झेंडा... -सोशल मीडियावरील पीडित युझर्सना कुणाकडे तक्रार करावी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण कोठे होईल, यासंदर्भात माहिती नाही. काही प्लॅटफॉर्मने यासाठी सहा मिन्यांची मुदत मागीतली होती. काहींनी म्हटले आहे, की ते अमेरिकेतील त्यांच्या मुख्यालयाकडून आदेशाची वाट पाहत आहेत. या कंपन्या भारतात काम करत आहेत. भारतात पैसा कमवत आहे. मात्र, गाइडलाइन्सचे पालन करण्यासाठी मुख्य कार्यालयच्या हिरव्या झेंड्याची प्रतिक्षा करत आहे. ट्विटरसारख्या कंपन्या स्वतःचे फॅक्ट चेकर नियुक्त करतात. मात्र, त्या त्यांची ना ओळख सांगतात, ना कशा प्रकारे तथ्य शोधले जाते, हे सांगतात. 

फेसबुक, किशोरवयीन मुलं, मद्य आणि डेटिंग

उद्यापासून लागू होणार नवे नियम -आयटी अॅक्टच्या कलम 79 नुसार, त्यांना मध्यस्थ म्हणून लाइबलिटीपासून सूट मिळालेली आहे. परंतु त्यांतील बऱ्याच कंपन्या सामग्रीवर निर्णय घेत आहेत. यांत भारतीय राज्यघटना आणि कायद्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नवे नियम 26 मे 2021 पासून लागू होत आहेत. जर या कंपन्यांनी नियमांचे पालन केले नाही, तर त्यांचे इंटरमीडिअरी स्टेटस काढून घेतले जाऊ शकते. त्या भारतात लागू असलेल्या कायद्यानुसार, गुन्हेगारी कारवाईच्या चौकटीत येऊ शकतात. 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकTwitterट्विटरInstagramइन्स्टाग्रामCentral Governmentकेंद्र सरकार