शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

अतिरेक्यांसाठी सोशल मीडिया ‘टूल’; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा संयुक्त राष्ट्रांच्या सीटीसी बैठकीत इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 11:23 AM

दहशतवादी गट, त्यांचे वैचारिक सहप्रवासी आणि एकेकटे हल्लेखोर यांना नव्या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या बळ मिळाले आहे.

नवी दिल्ली : समाजमाध्यमांचे प्लॅटफॉर्म्स दहशतवादी गटांसाठी सक्षम ‘टुल किट’ साधने बनत आहेत, असा इशारा भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी शनिवारी दिला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ‘दहशतवादविरोधी समिती’च्या (सीटीसी) विशेष बैठकीत ते बोलत होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून अशा बैठकीचे आयोजन भारतात प्रथमच करण्यात आले आहे.  

जयशंकर यांनी सांगितले की, दहशतवादी गट, त्यांचे वैचारिक सहप्रवासी आणि एकेकटे हल्लेखोर यांना नव्या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या बळ मिळाले आहे. या शक्ती नवे तंत्रज्ञान आणि क्रिप्टो चलनाचा वापर करीत आहेत. समाजांना अस्थिर करण्यासाठी तसेच कट्टरता पसरविण्यासाठी ते खोटा प्रचार आणि कटकारस्थानांचा आधार घेत आहेत. ड्रोनसारख्या अत्याधुनिक मनुष्यविरहित हवाई यंत्रणांचा वापरही ते करीत असून ही अधिक चिंतेची बाब आहे.

पाकिस्तानचे थेट नाव न घेता जयशंकर यांनी म्हटले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मागील २ दशकांत महत्त्वपूर्ण यंत्रणा उभी केली. दहशतवादविरोधी निर्बंधांच्या पायावर उभी असलेली ही यंत्रणा दहशतवादाला राज्याचे धारेण म्हणून राबविणाऱ्या देशांना इशारा देण्यास सक्षम आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार तथा लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याला अजूनही शिक्षा झालेली नाही, याकडे जयशंकर यांनी लक्ष वेधले.

२६/११ हल्ला खटल्यासाठी हवा मजबूत पुरावा : पाकचा पुन्हा कांगावा

एस. जयशंकर यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत हा पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी भूमिकेबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करीत आहे. मुंबई हल्ल्याशी संबंधित खटला प्रभावीपणे निकाली काढण्यासाठी मजबूत पुरावा हवा.

कृती आवश्यक - 

अँटोनिओ ग्युटेरस लोकांना कट्टरपंथी बनविण्यासाठी तसेच समाजात अशांतता पसरविण्यासाठी विविध दहशतवादी गटांकडून होणारा तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी सर्व जगाने एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटेरस यांनी केले. बैठकीला उद्देशून पाठविलेल्या भाषणात ग्युटेरस म्हणाले की, काही घातक शक्ती, दहशतवादी गट नव्या तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत आहेत. त्याविरुद्ध संपूर्ण जगाने सामूहिकरीत्या उभे राहण्याची गरज आहे.

टॅग्स :Indiaभारतterroristदहशतवादी