शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्या पकडले अन्...
3
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
4
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
5
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
6
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
7
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
8
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
9
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
10
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
11
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
12
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
Daily Top 2Weekly Top 5

नितीश सरकारचे फर्मान! शासन, प्रशासनाविरुद्ध बोललात तर खबरदार; थेट कारवाई होणार

By देवेश फडके | Updated: January 22, 2021 12:28 IST

बिहारमध्ये सोशल मीडियावर उलट-सुलट बोलणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त महासंचालकांकडून यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे.

ठळक मुद्देशासन, प्रशासनाविरोधात सोशल मीडियावर टिप्पणी पडणार महागातआक्षेपार्ह आणि अवमानकारक विधाने केल्यास थेट कारवाई होणारबिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त महासंचालकांचे पत्र

पाटणा :बिहारमध्येसोशल मीडियावर उलट-सुलट बोलणाऱ्यांविरोधात आता कारवाई करण्यात येणार आहे. बिहारमधील खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि अपमानजनक पोस्ट करेल किंवा उलट-सुलट बोलेल, त्या युझरवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अतिरिक्त महासंचालकांकडून यासंदर्भातील एक पत्र समोर आले आहे. या पत्रात सदर माहिती देण्यात आली आहे. या पत्रात म्हटले आहे की, सोशल मीडियामध्ये सरकार, मंत्री, खासदार, आमदार तसेच सरकारी पदाधिकाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह, अपमानजनक आणि भ्रामक भाषेचा वापर अनेकदा करण्यात येतो. सायबर कायद्यानुसार हा गुन्हा आहे. असा कोणताही प्रकार समोर आल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडून पोलिसांना सूचना, माहिती देईल. यामुळे दोषींविरोधात प्रभावी कारवाई करता येईल, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

अतिरिक्त महासंचालकांचे पत्र समोर येताच आता यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. सोशल मीडियाला बिहार सरकार घाबरत आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात आला आहे. जाहिरातींमार्फत सरकार आपला अजेंडा राबवत आहे. यामुळे खऱ्या बातम्या दाबल्या जात आहेत. मात्र, सोशल मीडियातून सत्य बाहेर येते. त्यामुळे यावर अंकुश ठेवण्यासाठी कारवाई करण्याची भाषा केली जात आहे. नितीश कुमारांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते शक्ती यादव यांनी केला आहे. 

दुसरीकडे, राजद नेते तेजस्वी यादव यांनी सोशय मीडियावर ट्विट करत नितीश कुमार सरकारला आव्हान दिले आहे. ६० घोटाळ्यांचे सृजनकर्ता नितीश कुमार हे भ्रष्टाचाराचे भीष्म पीतामह, अट्टल गुन्हेगारांचे संरक्षणकर्ते आणि अवैध सरकारचे कमकुवत प्रमुख आहेत. बिहार पोलीस दारू विक्रीचे काम करत आहे. गुन्हेगारांना पाठिशी घातले जात असून, निरपराध व्यक्तींना शिक्षा केली जात आहे. मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, या आदेशानुसार मला अटक करावी, असे तेजस्वी यादव यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :BiharबिहारPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया