शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नवीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांशी चर्चेद्वारेच काढणार तोडगा, पंतप्रधान मोदी; खुल्या मनाने संवाद साधणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2021 04:41 IST

Narendra Modi News : शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एक दूरध्वनी करून केंद्र सरकारशी केव्हाही चर्चा करायला येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.

नवी दिल्ली : नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चेद्वारेच तोडगा काढण्याचा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेला प्रस्ताव अजूनही कायम आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी एक दूरध्वनी करून केंद्र सरकारशी केव्हाही चर्चा करायला येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारीसांगितले.दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चामध्ये भीषण हिंसाचार झाला होता. त्या पार्श्वभूमीवर तसेच संसदेचे अधिवेशन सुरळीत चालावे, यासाठी आयोजिलेल्या सर्व पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत मोदी बोलत होते.या बैठकीच्या कामकाजाची माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांना दिली. नव्या कृषी कायद्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकार अत्यंत खुल्या मनाने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. आमची याआधीही हीच भूमिका होती, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दिल्लीतील लाल किल्ल्यावर घडलेल्या हिंसाचाराबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. हा हिंसाचार करणाऱ्यांवर कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञात व्यक्तींनी विटंबना केली. त्या घटनेचाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. संसदेतील अडथळ्यांमुळे छोट्या पक्षांची अडचणपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संसदेमध्ये कामकाजात अडथळे आल्याने छोट्या पक्षांची विलक्षण अडचण होते. या पक्षांना त्यांचे विषय संसदेत मांडण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे मोठ्या पक्षांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालेल, यासाठी सहकार्य केले पाहिजे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण