शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

सोमनाथ भारती अखेर शरण

By admin | Published: September 28, 2015 11:49 PM

पत्नीने दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर आम आदमी पार्टीचे आमदार आणि

नवी दिल्ली : पत्नीने दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कुठलाही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर आम आदमी पार्टीचे आमदार आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना अखेर आत्मसमर्पण करावे लागले. सोमवारी भारतींची अग्रिम जामीन याचिका धुडकावून लावत, न्यायालयाने भारतींना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. यानंतर रात्री उशीरा भारतींनी द्वारका पोलिस ठाण्यात जात आत्मसमर्पण केले.तत्पूर्वी सकाळी सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि न्या. अमिताभ राय यांच्या खंडपीठाने भारतींच्यावतीने सादर माजी सॉलिसिटर जनरल गोपाल सुब्रमण्यम यांचा युक्तिवाद फेटाळून लावत अग्रिम जामीन देण्यास नकार दिला होता. याचिकाकर्त्याने आधी जबाबदार नागरिक या नात्याने आत्मसमर्पण करावे आणि मग दाद मागण्यासाठी आमच्याकडे यावे, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले. यानंतर सुब्रमण्यम यांनी आपल्या अशिलास आत्मसमर्पण करण्यासाठी मंगळवार संध्याकाळपर्यंतचा वेळ मागितला. मात्र न्यायालयाने ही विनंतीही फेटाळून लावत याचिकाकर्त्याने सोमवारी संध्याकाळी ६.३० वाजतापर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने आत्मसमर्पण केले तरच त्यांच्या जामीन याचिकेवर नव्याने १ आॅक्टोबरला सुनावणी केली जाईल, असेही न्यायालयाने बजावले. यानंतर रात्री उशीरा सोमनाथ भारतींनी पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण केले.(लोकमत न्यूज नेटवर्क)