शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

काँग्रेसमध्ये होणार मोठे बदल! सोनिया गांधींनी 'या' नेत्यांकडे सोपवली 5 राज्यांची जबाबदारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 12:19 PM

Congress : काँग्रेसने बुधवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे आकलन करण्यासाठी पाच नेत्यांची नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे आकलन करण्यासाठी आणि निवडणूक पराभवानंतर संघटनात्मक बदल सुचवण्यासाठी पाच वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केली आहे.

जयराम रमेश यांच्याकडे मणिपूर आणि अजय माकन यांना पंजाबमधील परिस्थितीचे आकलन करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. तर राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना गोव्यातील परिस्थितीचे आकलन करण्यास सांगितले आहे. याशिवाय, काँग्रेस नेते जितेंद्र सिंह उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन करतील. तसेच, अविनाश पांडे यांना उत्तराखंडमधील परिस्थितीचे आकलन करण्याचे काम सोपवण्यात आले आहे.

काँग्रेसने बुधवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे आकलन करण्यासाठी पाच नेत्यांची नियुक्ती केली आहे. तसेच, उमेदवारांकडून आणि महत्त्वाच्या नेत्यांना राज्यांमध्ये संघटनात्मक बदल करण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत.

काँग्रेसचा दारूण पराभवदरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या भाजपशासित राज्यांपैकी एकही राज्य काँग्रेसला जिंकता आले नाही, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने पराभव केल्यामुळे येथील सत्ता गमावली आहे. यापूर्वी 15 मार्च रोजी सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामे देण्यास सांगितले होते. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस