शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'ते' गांधीजींना हटवून RSSला देशाचं प्रतीक बनवू पाहतायत- सोनिया गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 13:33 IST

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महात्मा गांधींवर स्तुतिसुमनं उधळत त्यांनी भाजपा सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. आज सर्वांसाठीच एक ऐतिहासिक दिवस आहे. 150 वर्षांपूर्वी महात्मा गांधींसारख्या महापुरुषाचा या धरतीवर जन्म झाला. गांधीजींचं नाव घेणं सोपं आहे, पण त्यांच्या मार्गवरून चालणं अवघड असल्याचंही त्या म्हणाल्या आहेत.मागील पाच वर्षांत जे झालं ते आता पाहिलं असतं तर बापूसुद्धा दुःखी झाले असते, देशासमोर बेरोजगारीचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे, महिलादेखील देशात सुरक्षित नाहीत. गेल्या काही वर्षांपासून साम-दाम-दंड-भेदचा वापर करून ते स्वतःला फार ताकदवान समजतात. स्वतःच्या सत्तेच्या नशेत धुंद असलेल्यांना गांधीजींच्या निस्वार्थी सेवेचं मूल्य काय समजणार आहे. नव्या भारताच्या निर्मितीसाठी नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंह राव यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. सोनिया गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार हल्लाबोल केला आहे. काही जण महात्मा गांधींच्या ऐवजी RSSला देशाचं प्रतीक बनवू पाहत आहेत. परंतु हे शक्य नाही.आमच्या देशाचा पाया गांधीजींच्या विचारावर ठेवण्यात आला आहे. महात्मा गांधींच्या विचारांना छेद देऊन स्वतःच्या मार्गानं चालणारे याआधीही बरेच होऊन गेले. तरीही भारत कधीही भरकटला नाही. कारण आपला देशच गांधी विचारांच्या आधारवर उभा आहे. काही जण गांधी विचारांच्या विपरीत वागण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक असत्याचा आधार घेऊनच राजकारण करत आलेत, त्यांना गांधीजी सत्याचे पुजारी होते हे कसं समजणार. ज्यांची सत्तेसाठी सर्वकाही करण्याची तयारी आहे, त्यांना गांधीजींच्या अहिंसेचं महत्त्व कसं काय कळणार आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीMahatma Gandhiमहात्मा गांधी