शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

सोनिया गांधी नाराज आमदारांसमोर तयारीनिशी आल्या, ५ पैकी एका प्रश्नावर ठरणार ठाकरे सरकारचे भविष्य...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2022 1:12 PM

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील आमदारांची पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत काँग्रेसचे जवळपास २० आमदार उपस्थित होते.

नवी दिल्ली-

काँग्रेसच्या महाराष्ट्रातील आमदारांची पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची मंगळवारी दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत काँग्रेसचे जवळपास २० आमदार उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रासाठी काँग्रेसनं दुसऱ्यांदा परंपरा मोडली असं म्हणता येईल कारण तीन वर्षांपूर्वी हिंदुत्ववादी शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करुन काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला होता. आता काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये प्रभारी किंवा प्रदेशाध्यक्षांशिवाय थेट हायकमांडसोबत आमदारांची बैठक ही दुर्मिळ गोष्ट आहे. राहुल गांधी देखील या आमदारांना भेटणार आहेत. 

काँग्रेसच्या नाराज आमदारांकडून सोनिया गांधी यांनी खूप महत्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. यावेळी सोनिया गांधी देखील बैठकीत संपूर्ण तयारीनिशी आल्या होत्या. नाराज आमदारांचं म्हणणं सोनियांनी नीट लक्ष देऊन ऐकून घेतलंच पण त्यांनी आमदारांकडून पाच प्रश्नांमधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराबाबत महत्वाची माहिती जाणून घेतली. सोनियांनी आमदारांना विचारलेल्या पाच पैकी एक प्रश्न लक्षवेधी आणि महत्वाचा ठरणारा आहे. सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या नाराज आमदारांना राज्याच्या कॅबिनेटमध्ये किमान समान कार्यक्रमाला किती प्राधान्य दिलं जातं? असा थेट प्रश्न विचारला. त्यावर काँग्रेसच्या आमदारांचं मत जाणून घेतलं. सोनियांचा हा प्रश्न राज्यातील महाविकास आघाडीचं भवितव्य ठरवणारा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

तुमचं म्हणणं बेधडकपणे मांडा...सोनिया गांधी यांनी यावेळी काँग्रेस आमदारांना तुमचं म्हणणं स्पष्टपणे मांडा. मनात काही ठेवू नका, असं दोन-तीनवेळा आमदारांना म्हटलं. त्यानंतर आमदारांनी त्यांचं संपूर्ण मत सोनियांकडे व्यक्त केलं असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे मंत्री आमदारांना विश्वासात घेत नाहीत. विकास कामांबाबत विचारत नाही. पालकमंत्री पक्ष संघटनेला महत्व देत नाहीत. काही मंत्र्यांचा तोरा वाढला असून जनतेशी वागणूकही बदलली आहे. अशा मंत्र्यांना एकतर पदावरून दूर करा किंवा त्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा, अशी मागणी करीत आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. आपल्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असं सोनिया गांधी यांनी आमदारांना आश्वस्त केलं.

सोनिया गांधींनी नाराज आमदारांना विचारलेले ५ महत्वाचे प्रश्न पुढीलप्रमाणे..१. आमदारांची बैठक होते का?२. प्रत्येक मंत्र्यामागे त्या जिल्ह्याचे किती आमदार आहेत?३. संघटक आणि मंत्री यांच्यात किती ताळमेळ आहे?४. राज्याच्या कॅबिनेटमध्ये किमान समान कार्यक्रमाला किती प्राधान्य दिलं जातं?५. मंत्री कॅबिनेट बैठकीआधी प्रदेशाध्यक्ष आणि आमदारांचे प्रश्न समजून घेतात का?

सोनिया गांधी यांनी वरील पाच प्रश्नांमधून काँग्रेसच्या नाराज आमदारांकडून राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली आहे. तसंच नाराज आमदारांच्या मागण्यांवर कार्यवाही केली जाईल असं आश्वासन आमदारांना देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी देखील या आमदारांना भेटणार आहेत. काँग्रेसला पंजाबमध्ये बसलेला मोठा फटका लक्षात घेता महाराष्ट्रातील पक्ष व्यवस्थापनाकडे हायकमांडनं आता अधिक लक्ष दिल्याचे हे संकेत असल्याचं म्हटलं जात आहे. 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरे