शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

दिल्लीकरांसाठी दिलासा देणारी बातमी! मध्यरात्रीनंतर यमुनेचे पाणी ओसरू लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 22:30 IST

दिल्लीतून वाहणाऱ्या पाण्याने 208.62 मीटरपेक्षा उंची गाठली होती. परंतू, सकाळपासून दिल्लीचे पाणी वाढले नाही.

गेल्या तीन दिवसांपासून दिल्ली पाण्याखाली आहे. यमुनेला पूर आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा पाण्याखाली गेली असून दिल्लीला पाण्यात असतानाही २५ टक्के भागाला पिण्याच्या पाण्याशिवाय रहावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे दिल्लीत पाऊस एवढा न कोसळूनही पुराच्या पाण्यात रहावे लागत आहे. 

दिल्लीतून वाहणाऱ्या पाण्याने 208.62 मीटरपेक्षा उंची गाठली होती. परंतू, सकाळपासून दिल्लीचे पाणी वाढले नाही. हा स्तर बराच वेळ कायम राहिला होता. यामुळे दिल्लीतील पाणी आता ओसरू लागण्याचा अंदाज केंद्रीय जल आयोगाने लावला आहे. दिल्लीत यमुनेचा जलस्तर स्थिर झाला आहे. यामुळे आज रात्रीपासून पाणी ओसरण्यास सुरुवात होईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

संचालक शरद चंद्र यांनी सांगितले की, यमुनेच्या पाण्याची पातळी स्थिर झाली असून येत्या चार तासांत ती कमी होण्यास सुरुवात होईल. शुक्रवारी पहाटे 3 वाजेपर्यंत ते 208.45 मीटरपर्यंत खाली येणे अपेक्षित आहे. ते म्हणाले की, हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधील पाण्याचा प्रवाह दुपारी 4 वाजता 80,000 क्युसेकवर घसरला आहे. 

आताच हाती आलेल्या अपडेटनुसार दिल्लीत यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. रात्री 10 वाजता पाणी 208.63 मीटरवर पोहोचले आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. सायंकाळी 6 वाजता 208.66 मीटर एवढी पाणीपातळी नोंदवली गेली, तीच रात्री 8 वाजता कायम राहिली. दिल्लीकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. रात्रीनंतर पाण्याची पातळी 15 ते 25 सेंटीमीटरने कमी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :floodपूरdelhiदिल्ली