शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजपसाठी दक्षिण विजयाचे प्रवेशद्वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 02:08 IST

ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुक यांच्याशी युती करून ही निवडणूक लढविली

समीर इनामदार 

पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीत एनडीएने काँग्रेसप्रणीत आघाडीचा पराभव करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयासह काँग्रेसने दक्षिणेतील आपले राज्य गमावले आहे. दक्षिणेकडे कूच करण्यासाठी भाजपने यापूर्वी केलेल्या युक्त्यांना यश आले आहे. हा विजय त्यांना दक्षिणेकडील विजयासाठी प्रवेशद्वार ठरणार आहे. ३० सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी १६ ही मॅजिक फिगर आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसच्या एन. नारायणसामी यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनले होते. केंद्राने या राज्यात नायब राज्यपाल म्हणून माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांची नियुक्ती केली. त्यांनी तीन भाजप सदस्यांना लोकनियुक्त सदस्य म्हणून नियुक्त केले. त्यानंतर हे सरकार अस्थिर करून पाडण्यासाठी खेळी सुरू झाल्या. सरकार अल्पमतात आल्यानंतर नारायणसामी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर किरण बेदी यांना हटविण्यात आले. नंतर याठिकाणी निवडणुका झाल्या.

ऑल इंडिया एन.आर. काँग्रेसचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी भारतीय जनता पक्ष आणि अण्णा द्रमुक यांच्याशी युती करून ही निवडणूक लढविली. काँग्रेसने द्रमुक, व्हीसीके आणि भाकप यांच्याशी युती केली होती. मागील निवडणुकीत काँग्रेसने १५, एआयएनआरसीने ८, अण्णाद्रमुकने चार, द्रमुकने दोन जागा जिंकल्या होत्या. एन. नारायणसामी निवडून आले नसताना त्यांना मुख्यमंत्री बनविण्यात आल्याने आमदार नाराज होते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना उमेदवारीही देण्यात आली नव्हती. मागील निवडणुकीत भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. राज्याची विधानसभा किती लहान आहे, हे भाजपसाठी महत्त्वाचे नसून, याचा लाभ भविष्यात कितपत होईल, याकडे लक्ष ठेवून त्यांनी केलेली खेळी यशस्वी ठरली आहे. भाजपला कर्नाटकच्या पुढे भाजपला जाता आले नाही. तामिळनाडू आणि केरळमध्ये त्यांना यश आले नाही. त्यामुळे दक्षिणेकडे जाण्यासाठी मार्ग म्हणून पुदुच्चेरीला निवडण्यात आले. आता भाजपचे पुढील लक्ष्य तामिळनाडू असणार आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकTamilnaduतामिळनाडूKeralaकेरळ