शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

निवडणुकीत गैरव्यवहार झाले, चर्चा होऊ नये म्हणून 'काश्मीर फाईल्स' आणला; अखिलेश यादवांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 09:44 IST

नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळवात सर्वच राज्यांमध्ये भाजपला यश मिळालं.

Akhilesh Yadav UP Election Result : नुकतेच पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. पंजाब वगळवात सर्वच राज्यांमध्ये भाजपला यश मिळालं. उत्तर प्रदेशातही पुन्हा एकदा भाजपचं सरकार सत्तेत येणार आहे. या निवडणुकीच्या निकालावरुन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. "निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहारावर चर्चा होऊ नये यासाठी काश्मीर फाईल्स चित्रपट आणला गेला," असं ते म्हणाले. याशिवाय त्यांनी काही जागांचा उल्लेख करत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचाही आरोप केला. 

सोमवारी आपलं क्षेत्रा आजमगढ येथे पोहोचलेल्या अखिलेश यादव यांनी माजी मंत्री दुर्गा यादव यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. "काश्मीर फाईल्समधून होणाऱ्या कमाईतून विस्थापितांसाठी काम केलं गेलं पाहिजे. यासाठी २५ लोकांची समिती स्थापन करण्यात यावी. तसंच जे पैसे जमा होत आहेत, ते कसे खर्च करावे हे त्या समितीनं ठरवावं. सरकारनंही पुढे यावं. संपूर्ण पैसा हा पंतप्रधानांच्या निधीत जाऊ नये. निरनिराळ्या ठिकाणी राहत असलेल्या लोकांशी चर्चा करून त्यांच्यावर तो पैसा खर्च करावा," असं अखिलेश यादव म्हणाले.

यावेळी त्यांनी निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. "आपल्याला प्रशासनाशी लढायला हवं. मुरादाबाद येथे १ लाख ४७ हजार मतं मिळवणाऱ्याची मतमोजणी अडीच तास थांबवण्यात आली. यानंतर त्यांचा ७०० मतांनी पराभव झाल्याचं समजलं," असंही ते म्हणाले. यावेळी अखिलेश यांना ओवैसींबाबत प्रश्न विचारण्यात आला. "जो कोणी निवडणूक लढवेल त्याला काही ना काही मतं मिळतील. परंतु बसपा काय करत होती हा प्रश्न आहे. लोकशाही आणि संविधानाच्या मदतीनं आपला देश चालावा असं बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं. बसपानं तर भाजपसोबतच हातमिळवणी केली," असा आरोपही त्यांनी केला.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Akhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपाThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स