शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

कर्जबुडवे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीवरून विशेष न्यायालयाची ईडीवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 06:06 IST

हे सर्व लोक देशाबाहेर पळू शकले, कारण संबंधित तपास यंत्रणा त्यांना योग्यवेळी अटक करण्यात अपयशी ठरली, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला सुनावले.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेले विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना अटक करण्यात अपयशी ठरलेल्या ईडीवर विशेष पीएमएलए न्यायालयाने जोरदार टीका केली. हे सर्व लोक देशाबाहेर पळू शकले, कारण संबंधित तपास यंत्रणा त्यांना योग्यवेळी अटक करण्यात अपयशी ठरली, अशा शब्दांत न्यायालयाने ईडीला सुनावले.

चार्टर्ड अकाऊंटंट व्योमेश शहा याला परदेशात जाण्यापूर्वी न्यायालयाची परवानगी घेण्यासंबंधी घातलेली अट विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. एम. जी. देशपांडे यांनी रद्द केली. शहा याच्यावर गरवारे इंडस्ट्रीजच्या निहार गरवारे यांच्यासाठी पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे. त्याला गेल्यावर्षी अटक करण्यात आली होती. बीकेसीच्या एका प्रॉपटी व्यवहारादरे जे. अँड के. बँकेला १०० कोटी रुपयांचे नुकसान पोहोचविल्याचा आरोप आहे. शहा याची सशर्त जामिनावर सुटका केली. न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ शकत नाही, अशीही एक अट शहा याला घालण्यात आली होती. ही अट रद्द करण्यात यावी, यासाठी शहा याने विशेष न्यायालयात अर्ज केला. या अर्जाला ईडीच्या वकिलांनी विरोध केला.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCourtन्यायालयVijay Mallyaविजय मल्ल्याNirav Modiनीरव मोदी