शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

न्यायालयांवर विशेष गट दबाव टाकतोय, आधी आरोप करतात...; हरीश साळवेंसह ६०० वकिलांचे सरन्यायाधीशांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 13:06 IST

Harish Salve Letter to CJI Chandrachud: हे नेते एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आधी आरोप करतात आणि नंतर न्यायालयात त्याला वाचवितात. हे लोक न्यायपालिकेच्या निकालांना प्रभावित करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा खळबळजनक दावा हरीश साळवे यांनी केला आहे. 

देशात लोकसभा निवडणूक सुरु झाली आहे. याचवेळी ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि देशभरातील ६०० हून अधिक वकिलांनी सरन्यायाधीशांना न्यायपालिकेला एक विशेष गट कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पत्र लिहिले आहे. हे लोक न्यायपालिकेच्या निकालांना प्रभावित करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा खळबळजनक दावा साळवे यांनी केला आहे. 

यामध्ये साळवे व वकिलांनी कोणत्या प्रकारच्या प्रकरणांत हे केले जात आहे त्याचाही उल्लेख केला आहे. खासकरून राजकीय नेत्यांशी संबंधीत प्रकरणे, नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, अशा प्रकरणांमध्ये हा दबाव वाढत चालला असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या लोकांची कारस्थाने लोकशाही आणि न्यायपालिकेवरील विश्वासूपणासाठी धोकादायक असल्याचेही म्हटले आहे. 

हरीश साळवे यांच्यासह नन कुमार मिश्रा, आदिश अग्रवाल, चेतन मित्तल, पिंकी आनंद, हितेश जैन, उज्ज्वला पवार, उदय होला, स्वरूपमा चतुर्वेदी यांच्याही या पत्रावर सह्या आहेत. हा गट वेगवेगळ्या प्रकारे न्यायव्यवस्थेच्या कामकाजावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. हा गट आपल्या राजकीय दृष्टीकोणातून न्यायालयांच्या निर्णयांवर बाजू घेणे किंवा टीका करण्याचे काम करत आहे. सोबतच बेंच फिक्सिंगही थिअरी याच लोकांनी मांडली होती, असेही या पत्रात म्हटले आहे. 

हे नेते एखाद्यावर भ्रष्टाचाराचे आधी आरोप करतात आणि नंतर न्यायालयात त्याला वाचवितात. अशात जर त्यांच्या मनाविरोधात निकाल आला तर ते कोर्टात किंवा प्रसारमाध्यमांवर न्यायालयावरच टीका करण्यास सुरुवात करतात. काही शक्ती न्यायाधीशांना प्रभावित करणे किंवा त्यांना आपल्या बाजुने निकाल देण्यासाठी दबाव टाकण्याचेही काम करत आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही असे पहायला मिळाले होते. यामुळे न्यायालये वाचविण्यासाठी या विरोधात कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी साळवेंनी पत्रातून सरन्यायाधीशांकडे केली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४