शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

चीनचा सामना करण्यासाठी भारत तयार करतोय खास मिसाईल

By admin | Published: July 13, 2017 1:14 PM

भारत एक अशी मिसाईल तयार करत आहे, ज्यामुळे दक्षिण भारतातून चीनवर हल्ला करण्यास मदत मिळेल

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 13 -  भारताचं संपुर्ण लक्ष चीनकडे असून त्यादृष्टीनेच आण्विक शस्त्राचं आधुनिकीकरण केलं जात असून आपल्या आण्विक धोरणातही बदल केले जात आहेत. याआधी भारताचं लक्ष पाकिस्तानकडे असायचं, जे चीनकडे वळलं आहे असा दावा अमेरिकेच्या दोन प्रसिद्ध आण्विक तज्ञांनी केला आहे. ऑनलाइन मॅगजीन "आफ्टर मिडनाईट"च्या जुलै-ऑगस्टच्या अंकात यासंबंधी लेख छापण्यात आला आहे. भारत एक अशी मिसाईल तयार करत आहे, ज्यामुळे दक्षिण भारतातून चीनवर हल्ला करण्यास मदत मिळेल असाही दावा या लेखात करण्यात आला आहे. 
 
आणखी वाचा
 
"इंडियन न्युक्लिअर फोर्स 2017" शिर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या आपल्या लेखात हॅन्स एम क्रिस्टिन्स आणि रॉबर्ट एक नॉरिस यांनी सांगितलं आहे की, "अंदाजानुसार भारताकडे जवळपास 150 ते 200 न्यूक्लिअर वॉरहेड तयार करण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्लूटोनिअम उपलब्ध आहे. मात्र त्यांनी फक्त 120 ते 130 वॉरहेड तयार केले आहेत. दोन्ही तज्ञांनी दावा केला आहे की, नेहमी पाकिस्तानला लक्षात ठेवून तयार करण्यात येणारं भारताचं आण्विक धोरण आता चीनवर जास्त जोर देत आहे". 
 
भारताने जवळपास 600 किलो प्लूटोनिअमची निर्मिती केली असून 150 ते 200 वॉरहेड तयार करण्यासाठी ते पुरेसं आहे. मात्र अद्यापपर्यंत सर्व प्लूटोनिअमचा वापर करण्यात आला नसल्याचंही लेखात सांगितलं आहे.
 
लेखात सांगण्यात आलं आहे की, आण्विक शस्त्र विकसित करण्यामागचा भारताचा मुख्य उद्देश म्हणजे पाकिस्तानपासून आपलं रक्षण करणं आहे. मात्र आता ज्याप्रकारे आण्विक शस्त्रांचं आधुनिकीकरण केलं जात आहे ते पाहता भारत भविष्यात चीनला लक्षात ठेवून वाटचाल करत आहे. तज्ञांनी दर्शवलेल्या अंदाजानुसार, भारताजवळ सात आण्विक शस्त्र उपलब्ध आहेत. यामधील विमानातून चालवली जाणारी दोन,  जमिनीवरुन मारा करणारी चार तर समुद्रातून चालवली जाणारी एक बॅलिस्टीक मिसाईल आहे. 
 
लेखात सांगण्यात आलं आहे की, किमान अजून चार प्रणालींवर काम केलं जात असून, वेगाने त्यांचं आधुनिकीकरण केलं जात आहे. लवकरच ही क्षेणणास्त्र भारत तैनात करेल असंही सांगण्यात आलं आहे.