शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

जुम्मा ब्रेकवरून NDA मध्ये फूट! आसाम सरकारच्या निर्णयावर या महत्वाच्या मित्र पक्षानं उपस्थित केला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 2:07 PM

नीरज कुमार यांनी यानिर्णयाचा निषेध करताना म्हटले आहे की, धार्मिक आस्थेवर हल्ला करण्याचा अधिकार कुणालाही नाही...

आसाम सरकारने विधानसभेतील जुम्मा ब्रेकसंदर्भात घेतलेल्या निर्णयावरून आता एनडीएमध्ये फूट पडताना दिसत आहे. जेडीयू नेते नीरज कुमार यांनी शनिवारी आसाम सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे.

नीरज कुमार यांनी यानिर्णयाचा निषेध करताना म्हटले आहे की, धार्मिक आस्थेवर हल्ला करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तसेच, जर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी लोकांना गरीबीतून बाहेर काढण्यासाठी अधिक लक्ष दिले असते तर बरे झाले असते, असेही नीरज यांनी म्हटले आहे. ते एएनआय सोबत बोलत होते. 

कामाख्या मंदिरातील बळी वरही उपस्थित केला सवाल- जेडीयू नेते नीरज कुमार पुढे म्हणाले, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय संविधानाच्या मूलभूत सिद्धांताच्या विरोधात आहे. प्रत्येकाला आपली धार्मिक आस्था जपण्याचा अधिकार आहे. मला मुख्यमंत्री सरमा यांना विचारायचे आहे की, आपण रमझानदरम्यान शुक्रवारच्या सुट्टीवर बंदी घालत आहात आणि त्यामुळे कामाची कार्यक्षमता वाढेल असा दावा करत आहात. माँ कामाख्या मंदिर हा हिंदू परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे, आपण तेथील बळी प्रथेवर बंदी घालू शकता? 

असम सरकारनं जुम्मा ब्रेक रद्द केला - आसाम विधानसभेत कर्मचाऱ्यांना जुम्मा अर्थात शुक्रवारी मिळणारा दोन तासांचा ब्रेक आता रद्द करण्यात आला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोट्स करताना सरमा यांनी म्हटले होते, "आसाम विधानसभेने दोन तासांचा जुम्मा ब्रेक रद्द केला आहे. यामुळे काम आणि उत्पादकतेवर परिणाम होत होता. याच बरोबर आम्ही वसाहतवादी काळातील आणखी एक परंपरा संपवली आहे. मुस्लीम लीगचे सैयद सादुल्ला यांनी 1937 मध्ये ही प्रथा सुरू केली होती. मी विधानसभा अध्यक्ष आणि आपल्या आमदारांचे या ऐतिहासिक निर्णयासाठी आभार मानतो." एवढेच नाही तर, या निर्णयाच्या माध्यमाने आम्ही विधानसभेच्या उत्पादकतेला प्राधान्य दिले आहे, असेही मुख्यमंत्री हिमंता यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :AssamआसामNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीBJPभाजपा