शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Sri Lanka Crisis: भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती उद्भवणार? एस जयशंकर यांचे मोठे विधान; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 21:07 IST

Sri Lanka Crisis: श्रीलंकेत उद्भभवलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या बैठकीला संबोधित केले.

नवी दिल्ली: श्रीलंकेत उद्भभवलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी या बैठकीला संबोधित केले. सर्वपक्षीय बैठकीला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, श्रीलंकेला अत्यंत गंभीर संकटाचा सामना करावा लागत आहे आणि स्वाभाविकपणे भारताला त्यांची खूप काळजी आहे. भारतात अशाप्रकारची परिस्थिती निर्माण होण्याच्या दाव्यांना त्यांनी यावेळी स्पष्टपणे फेटाळून लावले.

भारताची श्रीलंकेशी तुलना चुकीची आहेश्रीलंकेच्या संकटावर सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी उद्घाटनपर भाष्य केले. ते म्हणाले की, हे एक अतिशय गंभीर संकट आहे. ही परिस्थिती आपल्या शेजारील देशात उद्भवल्यामुळे आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता आहे. श्रीलंकेबद्दल अनेक खोट्या तुलना केल्या जात आहेत. काही लोक अशी परिस्थिती भारतात होऊ शकते का? असा प्रश्न विचारत आहेत. पण, श्रीलंकेशी भारताची तुलना करणे चुकीचे आहे. भारतात अशाप्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही, असे ते म्हणाले.

सर्वपक्षीय बैठकीला अनेक नेते उपस्थित होतेसरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते. काँग्रेसचे पी चिदंबरम, मणिकम टागोर, राष्ट्रवादीचे शरद पवार, द्रमुकचे टीआर बालू आणि एमएम अब्दुल्ला, एआयएडीएमकेचे एम थंबीदुराई, तृणमूल काँग्रेसचे सौगता रॉय, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, आम आदमी पक्षाचे संजय सिंग, तेलंगणाचे केशव राव, वायएसआर काँग्रेसचे विजयसाई रेड्डी आणि एमडीएमकेचे वायको आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Sri Lankaश्रीलंकाS. Jaishankarएस. जयशंकरIndiaभारत