शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

८०० रेल्वे प्रवाशांचे वाचवले होते प्राण… आता केंद्र सरकारकडून होणार गौरव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:17 IST

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकार दरवर्षी रेल्वे क्षेत्रात विविध स्तरावर चांगले काम करणाऱ्या १०० जणांना अति विशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सन्मानित करते. 

नवी दिल्ली : भारतात रेल्वे हे सर्वात मोठे वाहतुकीचे साधन आहे. त्यामुळे सर्व रेल्वे गाड्यांमध्ये सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अगदी थोडीशी चूकही अनपेक्षित अपघात आणि जीवितहानी होऊ शकते. अशा परिस्थितीत रेल्वे कर्मचारी खूप सतर्क असतात. त्यानुसार त्यांचे कार्य असते. दरम्यान, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेत केंद्र सरकार दरवर्षी रेल्वे क्षेत्रात विविध स्तरावर चांगले काम करणाऱ्या १०० जणांना अति विशिष्ट रेल सेवा पुरस्काराने सन्मानित करते. 

यंदाही या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यात केंद्र सरकारने तामिळनाडूमधील श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्टर जफर अली यांना पुरस्कार जाहीर केला आहे. जफर अली यांनी  गेल्या वर्षी आलेल्या पुरातून जवळपास ८०० लोकांचे प्राण वाचवले होते. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवी हे २१ डिसेंबर रोजी साजरा होणारा अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार-२०२४ प्रदान करतील. दरम्यान, गेल्या वर्षी १७ डिसेंबर २०२३ रोजी मिक जॅम चक्रीवादळामुळे अचानक पूर आला होता. तिरुनेलवेली, तुतीकोरिन आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला होता. 

अशा स्थितीत सेंचर एक्सप्रेस ट्रेन नेहमीप्रमाणे तिरुचेंदूरहून चेन्नईसाठी रवाना झाली. ही ट्रेन श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर पोहोचली. त्यानंतर स्टेशन मास्टर जफर अली यांना अभियांत्रिकी अधिकाऱ्याकडून रेल्वे लाईन पुराच्या पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्टेशन मास्टर जफर अली यांनी तातडीने श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबवली होती. मुसळधार पाऊस आणि सर्वत्र अंधारामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने बराच वेळ ट्रेन एकाच ठिकाणी थांबल्याने संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्टर जफर अली यांच्याशी वादही घातला. 

अशा परिस्थितीत दुसरा दिवस उजाडला, तेव्हा रेल्वे स्थानकात सर्वत्र पाणी तुंबलेले पाहून सर्व प्रवासी आश्चर्यचकित झाले. जवळपास २ दिवस ट्रेन एका जागी उभी होती. आजूबाजूच्या गावकऱ्यांनी त्यांना अन्न व पाणी पुरवले. पूरसदृश परिस्थितीमुळे बचाव पथक सुमारे तीन दिवसांनी श्रीवैकुंटम रेल्वे स्थानकावर पोहोचले. वेळेवर ट्रेन थांबवल्याने ८०० प्रवाशांचे प्राण वाचले. यानंतर स्टेशन मास्तर जफर अली यांचे विविध पक्षांकडून कौतुक करण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेTamilnaduतामिळनाडू