शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Successor : टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची नियुक्ती, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय
2
Noel Tata : रतन टाटांचा उत्तराधिकारी ठरला; कोण आहेत टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा?
3
पाकिस्तानच्या हाती घबाड लागले; सौदीने या गोष्टीसाठी दोन अब्ज डॉलर मोजले...
4
मुलाकडून विरोध तर वडिलांकडून मदतीचं आवाहन, कागलच्या राजकारणात पुन्हा नवा 'ट्विस्ट'!
5
"अजितदादा आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं", राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
6
शरद पवारांची खेळी उलटणार?; इंदापूरात हर्षवर्धन पाटलांविरोधात स्थानिक नेते एकटवले
7
Maharashtra Politics : अभिजीत पाटलांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली; माढ्यात उमेदवारी मिळणार?
8
"आम्हाला शक्य तितक्या लवकर..."; घरच्या मैदानात लाज गेल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचे विधान
9
अजित पवार मोठी घोषणा करणार?;  पटेल, तटकरे, छगन भुजबळांसह घेणार पत्रकार परिषद
10
PAK vs ENG : हे फक्त पाकिस्तानात होऊ शकतं! दारुण पराभवानंतर PCB मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
11
Who is Shantanu Naidu: "गुडबाय माय डियर लाईट हाऊस"; टाटांसह सावली सारखा असणारा शंतनू नायडू कोण?
12
पाकिस्तान क्रिकेट संघावर एवढी वाईट वेळ का आली? जाणून घ्या त्यामागची ५ प्रमुख कारणं
13
PAK vs ENG : पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने घरात घुसून कार्यक्रम केला, शेजाऱ्यांची पुन्हा फजिती
14
अखेर नवी मुंबई विमातनळावर उतरलं पहिलं विमान; धावपट्टीची चाचणी यशस्वी
15
१४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं! पाकिस्तानचे लाजिरवाणे विक्रम; ३ वर्षांपासून विजयाचा दुष्काळ
16
इस्रायलचा लेबनानमध्ये भारतीय सैन्य असलेल्या ठिकाणी हल्ला; इंडोनेशियाचे तीन जवान जखमी, संयुक्त राष्ट्रे संतापली
17
AUS vs IND : पुणेकर पडलाय मागे; त्या शर्यतीत माजी निवडकर्त्यानं दिली मुंबईकराला पसंती
18
Jio Financial Services नं लाँच केलं जिओ फायनान्स अ‍ॅप; युझर्सना मिळणार अनेक ऑफर्स, जाणून घ्या
19
करिअर की लग्न यात गोंधळलात? ऐश्वर्या नारकर यांनी तरुणाईला दिला मोलाचा सल्ला, उलगडला त्यांचा प्रवास
20
Airtel, Jio की Vi, कोणत्या कंपनीकडे आहे सर्वात स्वस्त Netflix प्लॅन?

मुख्यमंत्री येताच पाऊस सुरू झाला, गारा पडल्या; कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन पळ काढला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 11:15 AM

काँग्रेस कार्यकर्ते ज्या खुर्च्यांवर बसले होते, त्या खुर्च्या डोक्यावर घेऊन निघून गेले. हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच झाला.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत विभागीय स्तरावरील कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी शुक्रवारी अजमेरला पोहोचले. मात्र मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी पोहोचताच जोरदार पाऊस सुरू झाला आणि गारा पडू लागल्या. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते ज्या खुर्च्यांवर बसले होते, त्या खुर्च्या डोक्यावर घेऊन निघून गेले. हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच झाला. कार्यकर्ते जात असल्याचं पाहून काही नेत्यांनी घाईघाईने सभास्थळाच्या गेटवर पोहोचून कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते थांबले नाहीत. यावेळी कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील बॅनर, पोस्टरही फाडले. पण, मुसळधार पावसात अशोक गेहलोत यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनीही कौतुक केलं आहे. 

कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेसचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा पुढे म्हणाले, राजस्थान सरकारने ऐतिहासिक कामे केली आहेत. जनतेला पुन्हा एकदा राजस्थानची सत्ता काँग्रेसच्या हाती सोपवायची आहे. आता जनतेत जाऊन काँग्रेस सरकारचे यश सांगण्याची पाळी काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड, काँग्रेसचे गुजरात प्रभारी रघु शर्मा आणि अन्य नेत्यांनीही संबोधित केले.

कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना गेहलोत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. भाजपाच्या राजवटीत घटनात्मक संस्थांचा गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे देशाची घटना आणि लोकशाही आता धोक्यात आली आहे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने अदानींचा मुद्दा उपस्थित केला आहे, त्यावर सरकारने उत्तर द्यायला हवे होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थान