शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

नवउद्योजकांसाठी ‘स्टार्टअप इंडिया’ मोहीम

By admin | Published: January 17, 2016 3:39 AM

देशात नवउद्योजकांची पिढी घडविण्यासाठी उद्यमशीलतेला प्रोत्साहन आणि नवविचारांना बळ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला.

नवी दिल्ली : देशात नवउद्योजकांची पिढी घडविण्यासाठी उद्यमशीलतेला प्रोत्साहन आणि नवविचारांना बळ देणाऱ्या महत्त्वाकांक्षी स्टार्टअप इंडिया मोहिमेचा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभारंभ केला. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींसह देशातील सुमारे १५०० स्टार्टअप प्रमुखांच्या उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात करताना केंद्र सरकार या देशातील तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वचनबद्ध आहे. गेल्या ७० वर्षांत जे घडू शकले नाही ते सर्व आम्ही आता स्टार्टअपच्या बळावर करू शकतो, अशी ग्वाही मोदी यांनी दिली. स्टार्टअपसाठी अनेक योजना आणि सवलती यावेळी त्यांनी जाहीर केल्या. ते म्हणाले,आमचे विचार वेगळे आहेत. सरकारने हे केले पाहिजे, ते केले पाहिजे अशी बहुतांश लोकांची भावना असते. परंतु सरकारने काय करू नये असा वेगळा विचार मी करीत असतो. आम्ही काय करू नये ते आपणच सांगा, असे आवाहन मोदी यांनी कार्यक्रमाला उपस्थित नवउद्योजकांना केले.यावेळी मोदी यांनी स्टार्टअप कार्ययोजना सुद्धा जारी केली. धाडसी आणि जोखीम पत्करण्याची तयारी असलेले लोकच यात यशस्वी होऊ शकतात. बँक बॅलन्स बघणारे पुढे जाऊ शकत नाहीत,याकडेही त्यांनी लक्ष वेधले. उद्घाटनापूर्वी पंतप्रधानांनी विज्ञान भवनात आयोजित स्टार्टअपवरील प्रदर्शनही बघितले. याप्रसंगी अर्थमंत्री अरुण जेटली, वाणिज्य व उद्योग मंत्री निर्मला सीतारमन, अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा आदी उपस्थित होते. काही महत्वाच्या घोषणा...-स्टार्टअपना आर्थिक मदतीकरिता १०,००० कोटी रुपयांचा निधी.-स्टार्टअपना पहिली तीन वर्षे आयकर सवलत.- व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकीला कॅपिटल गेन्स टॅक्स नाही. -एकच दिवसात स्टार्टअप सुरू करण्यासाठी पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमाने वाटप प्रक्रिया-स्वप्रमाणनची सुविधा, भारताला स्टार्टअप हब बनविणार-पेटंट प्रक्रियेचे सुलभीकरण, पेटंट शुल्कात ८० टक्क्यांपर्यत घट-चार वर्षात दोन हजार कोटी रुपयांचा क्रेडिट गॅरंटी निधी-सरकारी खरेदीत स्टार्टअपना सवलत-नवविचारांच्या प्रोत्साहनासाठी ‘अटल अविष्कार योजना’-५ लाख शाळांमध्ये १० लाख विद्यार्थ्यांसाठी नवविचार कार्यक्रम(लोकमत न्यूज नेटवर्क)