शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कमलनाथ सरकारचा वादग्रस्त नसबंदीचा आदेश अखेर मागे, कर्मचाऱ्यांना दिलं होतं टार्गेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 16:12 IST

टार्गेट पूर्ण नाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नो-वर्क, नो-पे आधारे वेतन दिले जाणार नाही, असे म्हटले होते.

ठळक मुद्देमध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने नसबंदीबाबत आदेश जारी केला होता. सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा 5 ते 10 पुरुषांच्या नसबंदीचे टार्गेट दिले होते. टार्गेट पूर्ण नाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नो-वर्क, नो-पे आधारे वेतन दिले जाणार नाही, असे म्हटले होते.

भोपाळ : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने वादग्रस्त नसबंदीबाबतचा आदेश अखेर मागे घेतला आहे. आरोग्य मंत्री तुलसीराम सिलावट यांनी आदेश रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. "नसबंदीचा आदेश मागे घेण्यात येत आहे. आम्ही कोणालाही सक्ती करणार नाही आणि  या आदेशाचा अभ्यास करू. तसेच, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक भारद्वाज यांची बदली झाली असून त्यांची सचिवालयात ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे", असे तुलसीराम सिलावट यांनी सांगितले. 

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारने नसबंदीबाबत आदेश जारी केला होता. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दरमहा 5 ते 10 पुरुषांच्या नसबंदीचे टार्गेट दिले होते. टार्गेट पूर्ण नाही करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नो-वर्क, नो-पे आधारे वेतन दिले जाणार नाही, असे म्हटले होते. एवढेच नव्हे, तर कर्मचाऱ्यांना बंधनकारक निवृत्ती देणार असेही सांगितले होते. यावर भाजपाकडून टीका करण्यात आली. त्यानंतर हा आदेश कमलनाथ सरकारने मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ सरकारच्या या निर्णयाला आणीबाणी 2 म्हटले आहे. "मध्य प्रदेशात अघोषित आणीबाणी आहे. हा काँग्रेसचा आणीबाणी भाग-2 आहे? एमपीएचडब्ल्यूचे काम करण्यात कमी असल्यास सरकारने कारवाई केली पाहिजे, पण लक्ष्य साध्य न केल्यास पगार रोखून निवृत्त करण्याचा निर्णय हुकूमशाही आहे." असे म्हणत शिवराज सिंह चौहान यांनी यांनी कमलनाथ सरकारवर टीका केली. 

याशिवाय, भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनीही कमलनाथ सरकारचा हा आदेश म्हणजे इंदिरा गांधींच्या काँग्रेसप्रणित आणीबाणीचा काळ आठवण करून देणारा आहे, अशी टीका कमलनाथ यांच्यावर केली. ते म्हणाले, "आपणास आणीबाणीचा काळ माहिती आहे. तेव्हाची काँग्रेस सरकारची आणीबाणीच्या काळातील नसबंदीची धोरणे अशाच प्रकारची होती. कमलनाथ हे काँग्रेसचे अनुभवी नेते आहेत, त्यामुळे ते अशाप्रकारचे निर्णय घेत आहेत. काँग्रेसशासित सर्व राज्यांची आज हीच स्थिती आहे", असे  संबित पात्रा म्हणाले.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपा