शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
3
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
4
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
5
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
6
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
7
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
8
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
9
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
10
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
11
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
12
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
13
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
14
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
15
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
16
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
17
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
18
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
19
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
20
शशी थरूर यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपचा ऐतिहासिक विजय; काँग्रेस खासदार म्हणाले, "हेच लोकशाहीचं सौंदर्य"
Daily Top 2Weekly Top 5

कमी मृत्यू दाखवणाऱ्या राज्यांची होणार चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:05 IST

आयसीएमआरचा पुढाकार : १५ राज्यांत चाचण्यांची सरासरीही कमी

हरीश गुप्ता ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अनेक राज्ये कोरोना विषाणूमुळे होणाºया मृत्यूंचे आकडे लपवत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आता संपूर्ण भारतात या जीवितहानीवर लक्ष ठेवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली या राज्यांच्या तुलनेत काही राज्ये मृत्यू कमी दिसावेत कमी लोकांच्या चाचण्या घेत आहेत. देशात गुजरात हे एकमेव राज्य असे असावे की, त्याने कोविड-१९ च्या चाचणीसाठी रुग्णालयात दाखल करणे अनिवार्य केले आहे. दिल्ली राज्यानेही चाचणीच्या पद्धतीत बदल केला आहे. दिल्लीचे म्हणणे असे की, आम्ही कोविड पॉझिटिव्हच्या सहवासात उघडपणे लक्षणे नसलेले लोक आले तरी त्यांच्या चाचण्या करणार नाही.

पश्चिम बंगालने ७२ जणांच्या मृत्यूचा समावेश कोविडने झालेल्या मृत्यूच्या यादीत समावेश केला नाही. कारण ते अनेक आजारांचे रुग्ण होते व ही बाब आयसीएमआरच्या निकषाविरुद्ध होती. देशात दर दहा लाख लोकसंख्येमागे सरासरी चाचण्या ३०७४ होत असताना १५ राज्ये अशी आहेत की त्यांच्या चाचण्यांची संख्या या सरासरीपेक्षाही कमी असल्याचे समोर आले आाहे.

भारतात मृत्यूचा दर कमी का दाखवला जात आहे याबाबत पंतप्रधानांच्या टास्क फोर्सच्या सदस्यांनीही खुलासा मागवल्यावर आयसीएमआरने शेवटी कारवाईची तत्परता दाखवली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या मंगळवारी ठामपणे सांगितले की, देशात मृत्यूचा आकडा हा फारच कमी दाखवला असे नाही आणि भारताचा मृत्यू दर हा जगात सगळ््यात कमी २.८० टक्के आहे.आयसीएमआरने आता रुग्णालयाबाहेरही कोविड-१९ मुळे लोकांचे प्राण जात आहेत का हे बघण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीएमआर मृत्यूची संख्या कमी सांगण्यात काही असाधारण घडले का याचे मूळात जाऊन विश्लेषण करणार आहे. कोविड-१९ च्या रुग्णांना सुविधेअभावी दाखल करून घेतले जात नाही, चाचण्या केल्या जात नाहीत, ते घरीच विलगीकरणात (क्वारंटाईन) राहतात आणि जर त्यांच्यापैकी कोणाचा मृत्यू झाल्यास तो कोविड-१९ मुळे झाला असे मोजले जात नाही. ही बाब या सगळ््या घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या संस्थाच्या लक्षात आली आहे.

मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अगदी जवळच्या नातेवाईकांनाही हा मृत्यू कोविड-१९ मुळे झाला, अशी नोंद व्हावी नको होते.मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्यास संबंध कोरोनाशी जोडला जाऊ शकतोच्आयसीएमआरचे देखरेखीचे काम कोविड-१९ महामारी जेवढे दिवस असेल तेवढे चालेल आणि देशाच्या महानिबंधकांच्या आरोग्य आणि लोकसंख्याशास्त्रविषयक व्यवस्था आणि मृत्यू सांख्यिकी विभाग मृत्यूची जी साप्ताहिक आकडेवारी गोळा करीत आहे त्याचा अभ्यासही आयसीएमआर करणार आहे.च्परिषद याशिवाय यावर्षी मरण पावलेल्यांची माहिती मिळवून तिची तुलना मागच्या वर्षींच्या माहितीशी करणार आहे. त्या माहितीची तुलना मार्च ते मे या कालावधीसाठी केली जाईल आणि सत्य मिळवण्यासाठी रोजच्यारोज माहिती घेतली जाईल.2018मध्ये भारतात सामान्यत: २७ हजार मृत्यू रोज झाले होते. मृत्यूच्या सामान्य संख्येत जर कोणत्याही कारणाने वाढ झाल्यास त्याचा संबंध कोविड-१९ शी जोडला जाऊ शकतो. त्याची चौकशी होईल, असे आयसीएमआरच्या अधिकाºयाने म्हटले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या