शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

सावत्र आईने विषप्रयोग करून केली दोन मुलींची हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 5:03 PM

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे सावत्र आई आणि सख्ख्या वडिलांनी मिळून दोन मुलींची विषप्रयोग करून हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. येथे सावत्र आई आणि सख्ख्या वडिलांनी मिळून दोन मुलींची विषप्रयोग करून हत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बिजनौरमधील अकबरपूर तिगरी गावातील आहे. येथील नाजरिन नावाच्या महिलेने पती फरमानच्या मदतीने हादिया आणि आफिया परवीन या दोन मुलींची विषप्रयोग करून हत्या केली. नाजरिन ही मृत मुलीची सावत्र आई होती. या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये खळबळ उडाली. तसेच गावातील शेकडो लोक फरमान याच्या घराबाहेर जमा झाले.  

तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचं गांभीर्य पाहून एसपी अभिषेक झा हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत मुलीच्या वडिलांकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. मृत मुलींचा सख्खा बाप असलेल्या फरमान याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या पहिली पत्नी दिलशाना हिला घटस्फोट देऊन नाझरीन हिच्याशी दुसरा विवाह केला होता. 

पहिली पत्नी असलेल्या दिलशाना आणि फरमान यांच्या दोन मुली होत्या. मात्र दुसरी पत्नी नाझरिन हिला मात्र या मुली आवडत नव्हत्या. त्यामुळे त्या मुली सावत्र आईकडे न राहता आजोबांसोबत राहायच्या. मात्र काल त्या नाझरिन हिच्याकडे खेळण्यासाठी आल्या होत्या. त्याचदरम्यान, नाझरिन आणि फरमान यांनी मिळून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. 

पोलिसांनी मृत मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन  शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तसेच नाझरिन आणि फरमाना यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार