शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पश्चिम बंगालमध्ये रामनवमी मिरवणुकीत हिंसाचार, अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 08:23 IST

या हिंसक घटनेमुळे तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.

देशात ठिकठिकाणी रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात बुधवारी साजरा करण्यात आला. मात्र, पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात रामनवमीनिमित्त आयोजित मिरवणुकीत हिंसाचार झाल्याचे समोर येत आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सायंकाळी शक्तीपूर परिसरात घडली. रामनवमीनिमित्त येथे मिरवणूक काढण्यात आली. या घटनेचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काही लोक आपल्या घराच्या छतावरून मिरवणुकीवर दगडफेक करत असल्याचे दिसत आहेत.

या हिंसक घटनेमुळे तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आली असून अतिरिक्त फौजफाटा परिसरात पाठवण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. तसेच, जखमींना बहारमपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आणि दुकानांची तोडफोड केल्याचा आरोप भाजपाच्या बंगाल युनिटने केला आहे. भाजपाचे नेते आणि पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले, "रामनवमीच्या दिवशी मिरवणूक काढण्यासाठी प्रशासकीय परवानगी घेण्यात आली होती, परंतु शक्तीपूर, बेलडांगा - II ब्लॉक, मुर्शिदाबाद येथे मिरवणुकीवर हल्लेखोरांनी हल्ला केला. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे मिरवणूक अचानक संपली आणि रामभक्तांवर गोळीबार करण्यात आला."

दुसरीकडे, बहरामपूरचे खासदार आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी बुधवारी संध्याकाळी परिसराला भेट दिली. ते म्हणाले, "हिंदूंवर हल्ले होत असल्याचा दावा करत भाजपा कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये निदर्शने करत माझ्याकडे जाब विचारला. मात्र, निदर्शने करणाऱ्यांनी त्या लोकांना जाब विचारले पाहिजे, ज्यांना उत्तर देण्याची गरज आहे. तसेच, एका योजनेनुसार दंगल भडकावली जात आहे आणि भाजपाचा विरोध हे सिद्ध करतो. मी निवडणूक आयोगाशी बोललो आहे. शक्तीपूरला अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून एसपी घटनास्थळी आहेत."

दरम्यान, यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी रामनवमीच्या मुहूर्तावर राज्यात दंगल भडकवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप केला होता. गेल्या वर्षी, बंगालमध्ये रामनवमीच्या उत्सवादरम्यान हिंसाचार झाला होता, ज्यामुळे भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झाला होता. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालRam Navamiराम नवमी