शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Amit Shah: हिंमत असेल तर राम मंदिर उभारणीचं काम रोखून दाखवाच; अमित शाहांचं सपा, बसपा, काँग्रेसला खुलं आव्हान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:31 IST

भाजपा नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अयोध्येत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर कुणात हिंमत असेल तर राम मंदिर निर्माण कार्य रोखून दाखवावच, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिलं आहे.

अयोध्या-

भाजपा नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अयोध्येत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर कुणात हिंमत असेल तर राम मंदिर निर्माण कार्य रोखून दाखवावच, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिलं आहे. तसंच बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी सपा, बसपा आणि काँग्रेसवाल्यांनीच कारसेवकांवर गोळीबार केला होता हे कुणी कधी विसरू शकणार नाही, असंही शहा म्हणाले. आज उत्तर प्रदेशातभाजपाच्या सरकारमुळे माफिया राज स्वत: पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण करत आहेत, असंही ते पुढे म्हणाले. 

"ज्या कुणाचा राम मंदिर उभारणीचं काम थांबवण्याचा इरादा आहे. त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही काम थांबवून दाखवाच. इतकी हिंमत कुणातच नाही. पंतप्रधान मोदींनी काशी विश्वनाथ कॉरिडोअरचं पुनर्निमाण केलं. औरंगजेबाच्या काळात जो बाबा विश्वनाथाच्या दर्शनासाठी येत असे त्या निराश होऊन माघारी परतावं लागत होतं", असं अमित शहा म्हणाले. 

"बुआ बबुआ आणि काँग्रेस पक्षानं कधीच उत्तर प्रदेशचा विकास केला नाही. सपाच्या कार्यकाळात संपूर्ण राज्यात फक्त गुंडगिरी आणि माफियाराजचा विकास झाला. आमच्या लोकांना पळ काढण्यासाठी जबरदस्ती केली जात होती. योगींचं सरकार आल्यांतर दुसऱ्यांना पळवणारे आज स्वत: पळ काढत आहेत. याआधी माफियांना पोलीस प्रशासन घाबर होतं. पण आता माफिया स्वत: पोलिसांसमोर येऊन आत्मसमर्पण करत आहेत", असंही अमित शाह म्हणाले. 

बुआ बबुआ सरकारच्या काळात आपल्या प्रतिकांचा सन्मान होत नव्हता. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येकाच्या आस्थेचा सन्मान केला आहे. जनतेनं संपूर्ण बहुमतानं मोदींना पंतप्रधानपदी बसवलं आणि भाजपाचं सरकार देशात आणलं. आज मला पाहायला मिळतंय की रामलल्लाचं मंदिर आज साकार होण्यास सुरुवात झाली आहे, असं अमित शाह म्हणाले.

राम लल्लाचं मंदिर होऊ नये यासाठी काँग्रेस, सपा आणि बसपानं त्यांच्या शासनकाळात खूप प्रयत्न केले. त्यांनी कारसेवकांवर गोळीबार केला होता याची तुम्हाला आठवण असेल. कारसेवकांवर लाढीचार्ज केला होता. कारसेवकांना मारून त्यांचे मृतदेह शरयू नदीत टाकले होते, असं अमित शहा उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश