शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

बुरहान वानीचं उदात्तीकरण बंद करा, भारताचा पाकिस्तानला इशारा

By admin | Published: July 10, 2017 9:14 AM

हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला शहीद बनवण्याचा प्रयत्न करु नका असं सांगत भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - हिजबूल मुजाहिद्दीनचा दहशतवादी बुरहान वानीला शहीद बनवण्याचा प्रयत्न करु नका असं सांगत भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे. गतवर्षी 8 जुलै रोजी भारतीय लष्कराच्या जवानांनी बुरहान वानीचा खात्मा केला होता. बुरहान वानीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करणा-या पाकिस्तान सरकारला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाळ बागले यांनी खडे बोल सुनावले आहेत.
 
आणखी वाचा 
चीनच्या धमकीला ठेंगा, भारतीय लष्कराने डोकालममध्ये गाडले तंबू
जी-20 सदस्य देशांनी केला दहशतवादाचे कंबरडे मोडण्याचा संकल्प
 
"आधी पाकिस्तानचं परराष्ट्र मंत्रालय जे लष्कर-ए-तोयबा सांगायचं तेच बोलत होतं. आता पाकिस्तानचे लष्कर प्रमुख बुरहान वानीचं उदात्तीकरण करत आहेत. पाकिस्तानकडून मिळणा-या दहशतवाद समर्थनाचा सर्वांनी निषेध करायला हवा", असं ट्विट गोपाळ बागले यांनी केलं आहे. 
 
पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी दहशतवादी बुरहान वानीचं कौतुक केलं होतं. इतकंच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनीदेखील बुरहान वानीला श्रद्धांजली वाहिली. त्याचा मृत्यू काश्मीर खो-यातील स्वातंत्र्याच्या लढाईल बळ देईल असंही ते बोलले होते. याच पार्श्वभुमीवर गोपाळ बागले यांनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
जर्मनीतील जी20 परिषदेत दहशतवादाविरोधात भूमिका मांडण्यात आल्यानंतर पाकिस्तानने बुरहान वानीचं कौतुक केलं आहे. जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुरू असलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली होती. संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-20 नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला होता. तसेच दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात एकजूट करण्याची घोषणा केली होती. 
 
दरम्यान, पाकिस्तानने सलग दुस-या दिवशी शस्त्रसंधी उल्लंघन केल्याचा आरोप करत इस्लमाबादमधील भारतीय उप-उच्चायुक्तांना समन्स बजावला आहे. नियंत्रण रेषेवर भारताकडून शस्त्रसंधी उल्लंघन केलं असून, फायरिंगमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. चिरीकोट आणि सतवाल सेक्टरमध्ये शनिवारी भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या फायरिंगमध्ये तीन सामान्य लोकंचा मृत्यू झाल्याचाही दावा करण्यात आला होता. 
 
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाचे डायरेक्टर जनरल (दक्षिण आशिया आणि सार्क) मोहम्मद फैसल यांनी हे समन्स बजावलं असून, भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबाराचा निषेध केला आहे. भारतीय जवान जाणुनबुजून स्थानिकांना टार्गट करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारतीय अधिका-यांनी मात्र पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत पुंछ आणि कृष्णघाटी सेक्टरमध्ये सर्वात आधी पाकिस्तान जवानांनी गोळीबार सुरु केला होता, आम्ही फक्त प्रत्युत्तर दिलं असं सांगितलं आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात दोन भारतीयांचा मृत्यू झाला असून, भारताने यासंबंधी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.