शहरं
Join us  
Trending Stories
1
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
2
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
3
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
4
अक्षय शिंदे मेला की मारला..? न्याय मिळाला की नाही..?
5
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
6
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
7
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
8
हायकोर्टाच्या केवळ ९८ न्यायाधीशांनी जाहीर केली संपत्ती; ६५१ न्यायाधीशांकडून मात्र मौनच
9
भारत हे वरदान अन् इराण हा शाप !; संयुक्त राष्ट्रांत इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांनी दाखवले नकाशे
10
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान
11
‘ते’ अधिकारी दोन दिवसांत बदला! निवडणूक आयोगाने राज्य सरकारला ठणकावले
12
भीतीदायक ‘फ्युचर’ अन् तोट्यातले ‘ऑप्शन्स’, तोट्याची गुंतवणूक तरी तिकडेच का वळतात पावले?
13
सॉफ्टवेअरद्वारे आगीची दुर्घटना तत्काळ कळणार; ११ शासकीय रुग्णालयांत लवकरच अद्ययावत यंत्रणा
14
अक्षयच्या एन्काउंटरबाबत सत्य लवकरच उघड होईल; ॲड. अमित कटारनवरे यांचा दावा
15
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करा; मुंबईतील वकिलाची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका 
16
रुग्णालयात औषधांचा तुटवडा, रुग्णांचे आरोग्य रामभरोसे; थकबाकी ४० लाखांवर,
17
कुटुंबाचे कसे होणार? ही चिंता मिटविण्यासाठी...
18
लग्नाच्या आमिषाने बलात्कार आरोप अग्राह्य; विवाहितेच्या तक्रारीवर उच्च न्यायालयाचे निरीक्षण
19
झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८५०० कोटी; एमएमआरडीएकडून निधी मंजूर
20
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!

वहाबी दहशतवादी विचारसरणीला रोखा - RSS च्या मुखपत्रातून सल्ला

By admin | Published: July 08, 2015 1:51 PM

इस्लाममधल्या वहाबी दहशतवादी विचारसरणीचा भारतात प्रसार होण्यापासून रोखायचा असेल तर मुस्लीम नेत्यांनी आणि राज्यकर्त्यांनी मुस्लीम तरुणांच्या आधुनिक शिक्षणावर आणि आर्थिक विकासावर भर द्यायला हवा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - इस्लाममधल्या वहाबी दहशतवादी विचारसरणीचा भारतात प्रसार होण्यापासून रोखायचा असेल तर मुस्लीम नेत्यांनी आणि राज्यकर्त्यांनी मुस्लीम तरुणांच्या आधुनिक शिक्षणावर आणि आर्थिक विकासावर भर द्यायला हवा असा सल्ला ऑर्गनायझर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील एका लेखात देण्यात आला आहे. पंकज शर्मा या अमेरिकास्थित तज्ज्ञाच्या अभ्यासानुसार कुटुंबनियोजन आणि आर्थिक विकास भारतीय मुस्लीमांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारतासह जगभरामध्ये मुस्लीमांचे प्रमाण वाढत असल्याच्या अहवालांचा आधार घेत शर्मा यांनी २०३० मध्ये मुस्लीम हे भारतीय लोकसंख्येच्या १८ ते १९ टक्के असतिल हे  नमूद केले आहे. तसेच भारतीय मुस्लीम मध्य पूर्वेतल्या काही देशांप्रमाणे कट्ट्ररतावादाकडे झुकणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वहाबी दहशतवादी IS सारख्या माध्यमातून कशी मुस्लीम तरूणांना भरीस पा़डतात हे आपण बघितलेच आहे, त्यामुळे राज्यकर्त्यांनी व मुस्लीम नेत्यांनी आधुनिक आर्थिक विकासाचे मॉडेल व शिक्षण यांच्यावर भर देत या समस्येचा मुकाबला करायला हवा असे मत शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय लाभ बाजुला ठेवूनभारताने वहाबी दहशतवादाला प्रोत्साहन देणा-या देशांशीही संबंध ठेवताना साधकबाधक विचार करायला हवा असे मत ऑर्गनायझरमध्ये व्यक्त करण्यात आले आहे.
भारतामध्ये अद्यापतरी मोठ्या प्रमाणावर मुस्लीमांनी वहाबीझमला तसेच दहशतावादाला थारा दिलेला नाही हे खरे असले तरी धर्मांतर व प्रसार करत लोकसंख्यावाढीच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इस्लामचा वापर करत असल्याकडे शर्मा यांनी लक्ष वेधले आहे. 
या प्रश्नाकडे वेळीच नीट लक्ष दिले नाही तर केवळ आशियासाठीच नाही तर जगासाठी भारत ही वहाबींची युद्धभूमी बनेल असा इशारा ऑर्गनायझरमध्ये देण्यात आला आहे.