शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

देशात मंदी असती तर कोट-जॅकेटऐवजी धोतरावर फिरलो असतो; भाजप खासदाराचा अजब तर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 10:33 IST

विरोधीपक्ष देशातील आर्थिक मंदीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहे. घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी, मंदी यासह आर्थिक बाबतीत होत असलेल्या पिछेहटीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. तर भाजपकडून देशात मंदी नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. 

नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेत मंदी नसून तेजी असल्याचं देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेकदा सांगितले आहे. आता त्यांच्या पक्षाच्या खासदाराने देखील देशात मंदी नसल्याचे सांगत अजब तर्क मांडला आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया मतदार संघाचे खासदार विरेंद्र सिंह यांच्यानुसार देशात मंदी नाही. देशातील नागरिक पारंपरिक धोतर-कुर्ता परिधान करण्याऐवजी कोट आणि जॅकेट परिधान करत आहेत. मग मंदी कसकाय, असा अजब सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीसह संपूर्ण जगात मंदीवर चर्चा होत असून यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. 

जगभरात मंदीवर चर्चा होते. परंतु, मंदी असती तर देशात कोट आणि जॅकेटऐवजी लोकांनी धोतर-कुर्ता परिधान केले असते. मंदीत आपण कपडे खरेदी केले नसते. पँट आणि पायजामा खरेदी केला नसता असे सांगत त्यांनी भारत केवळ शहरांचा नव्हे तर खेड्यापाड्यांचा देश असल्याचे नमूद केले. देशात 6.5 लाख गावं आहेत. महत्मा गांधी, डॉक्टर हेडगेवार, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि जयप्रकाश नारायण यांनी देखील ग्रामीण भागावर विश्वास दाखवला होता, याची आठवण विरेंद्र सिंह यांनी करून दिली. 

दरम्यान विरोधीपक्ष देशातील आर्थिक मंदीवरून सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहे. घसरणारा जीडीपी, वाढती बेरोजगारी, मंदी यासह आर्थिक बाबतीत होत असलेल्या पिछेहटीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जात आहे. तर भाजपकडून देशात मंदी नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे.