शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

हिंसक गोरक्षकांवर होणार कठोर कारवाई, पंतप्रधान मोदींचा इशारा

By admin | Published: July 16, 2017 1:39 PM

गोरक्षेच्या नावावर देशात होत असलेल्या हिंसक घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16- गोरक्षेच्या नावावर देशात होत असलेल्या हिंसक घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात गोरक्षेची भावना आहे. मात्र हिंसक गोरक्षकांवर कठोर कारवाई होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी हा इशारा दिला आहे. 
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मोदींनी गोरक्षकांसह विविध मुद्द्यांवर आपले मत स्पष्ट केले. या बैठकीनंतर भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, " मोदींनी हिंसक गोरक्षकांबाबत कठोर भूमिका घेतली आहे, ते म्हणाले की, देशात गोरक्षेबाबत भावना आहे. मात्र गोरक्षेसाठी कोणत्याही प्रकारची हिंसा खपवून घेतली जाणार नाही. हिंसक गोरक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. राज्य सरकारांनी हिंसक गोरक्षकांवर कारवाई करावी." गेल्या काही काळापासून गोरक्षकांकडून गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अनेकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच त्यात अनेकांचा बळीसुद्धा गेला आहे. याआधीही मोदींनी साबरमती आश्रमाच्या शताब्दी महोत्सवात बोलताना गोरक्षणाच्या नावाखाली लोकांची हत्या करणे मंजूर नाही. हे महात्मा गांधींनाही मान्य नव्हते", असे म्हटले होते. अधिक वाचा
 
(नरभक्षकाप्रमाणे आहेत स्वयंघोषित गोरक्षक : रामदास आठवले )( गोरक्षक मोकाट! गोमांस बाळगल्याच्या संशयावरून अजून एकाची हत्या )(गोरक्षकांची आता काश्मीरमध्येही झुंडशाही )दरम्यान, मोदींनी या बैठकीत देशात जीएसटी यशस्वीरीत्या लागू झाल्याबद्दल सर्व पक्षांचे अभिनंदन केले. तसेच पूर्वोत्तर भारतात आलेल्या पुराबाबत पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. तसेच 9 ऑगस्ट रोजी छोडो भारत आंदोलनाच्या 75व्या वर्धापन दिनी संसदेत चर्चा व्हायला हवी, असा प्रस्तावही मोदींनी ठेवल्याचे अनंत कुमार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.