शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

कडक लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था सापडली संकटात; सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 1:30 AM

बँकांनी आकारलेल्या अतिरिक्त व्याजाबाबत केंद्राने आपली भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र अद्याप सादर का केले नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कडक स्वरूपाच्या लॉकडाऊनमुळे देशातील अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केले.

कोरोनामुळे बँकांनी कर्जाचे हप्ते वसूल करण्यास तीन महिन्यांची तात्पुरती स्थगिती रिझर्व्ह बँकेने दिली होती. आता या निर्णयाची मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपत आहे. स्थगितीच्या काळातील कर्जाच्या हप्त्यावर आता बँकांनी अतिरिक्त व्याज आकारले आहे. त्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनावणीप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अशोक भूषण व न्या. एम. आर. शाह यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले. बँकांनी आकारलेल्या अतिरिक्त व्याजाबाबत केंद्राने आपली भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र अद्याप सादर का केले नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारले.

केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. अतिरिक्त व्याजाचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला असे केंद्राचे म्हणणे आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने याप्रकरणी दाखल केलेले उत्तर वाचले असता, या प्रकरणात रिझर्व्ह बँकेच्या मागे दडून केंद्र सरकार सूत्रे हलवत आहे हे स्पष्ट होते, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. बँकांनी आकारलेल्या अतिरिक्त व्याजासंदर्भात येत्या आठवडाभरात केंद्र सरकार आपली भूमिका स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सादर करेल, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितल्यावर तेवढ्या दिवसांची मुदतवाढ न्यायालयाने दिली.एनपीए वाढण्याची शक्यतासर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, कोरोना साथीमुळे देशातील आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. अशा प्रसंगी केंद्र सरकारने काही काळ आर्थिक व्यवसायाचा विचार बाजूला ठेवावा. कर्जाचे हप्ते भरण्यास तीन महिने तात्पुरती स्थगिती दिलेल्या काळातील व्याज माफ करावे, अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर याचिकादारातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, कर्जाचे हप्ते वसूल करण्यास तीन महिन्यांची दिलेली तात्पुरती स्थगिती संपल्यानंतर या कर्जांचा समावेश नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेटमध्ये (एनपीए) होणार आहे. त्यामुळे मोठा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या समस्येवर योग्य उपाय सापडेपर्यंत कर्जाचे हप्ते भरण्यास तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी विनंतीही सिब्बल यांनी याचिकादारातर्फे न्यायालयाला केली.क्रयशक्ती वाढवा -राहुल गांधीदेशातील अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना देण्यासाठी गरिबांच्या हातात पैसा देऊन त्यांची क्रयशक्ती वाढविली पाहिजे, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक आहे, अशी टीकाही त्यांनी मोदी सरकारवर केली.राहुल गांधी यांनी सांगितले की, केंद्र सरकार प्रसारमाध्यमांचा त्याच्या सोयीने वापर करीत आहेत. मात्र, त्यामुळे ना गरिबांना कोणती मदत होणार ना अर्थव्यवस्थेसमोर उभे राहिलेले संकट दूर होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने मंगळवारी म्हटले आहे की, अर्थव्यवस्थेतील मागणी प्रमाण वाढण्यास अजून काही कालावधी लागणार आहे. या वित्तीय वर्षातील मागणीचे प्रमाण पाहता क्रयशक्तीला मोठा फटका बसला असल्याचे सिद्ध होते. रिझर्व्ह बँकेच्या या विधानानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा टीकेची झोड उठविली आहे.राहुल गांधी म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून मी जे सांगत होतो, त्यावर रिझर्व्ह बँकेनेच आता शिक्कामोर्तब केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकारEconomyअर्थव्यवस्था