शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

‘चौकीदार’वर ठाम; राहुल गांधींना कन्टेम्प्ट नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 03:49 IST

राफेल प्रकरणासोबत होणार सुनावणी; तूर्तास हजर न राहण्याची मुभा

नवी दिल्ली : ‘चौकीदार चोर है’ या घोषणेवर मी आणि माझा पक्ष ठाम आहे, अशा आशयाचे वक्तव्य न्यायालयाच्या तोंडी घालण्याच्या अनवधानाने घडलेल्या चुकीपुरतीच मी दिलगिरी व्यक्त केली आहे, अशी भूमिका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यावर अवमानना प्रकरण (कन्टेम्प्ट आॅफ कोर्ट) चालविण्याची नोटीस मंगळवारी जारी केली. मात्र, राहुल गांधींना हजर न राहण्याची तूर्तास मुभा देण्यात आली.या वक्तव्याबद्दल राहुल यांच्यावर न्यायालयीन अवमाननेची कारवाई करावी, अशी याचिका भाजपच्या मीनाक्षी लेखी यांनी केली आहे. राहुल यांनी वक्तव्याचा खुलासा करणारे प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर हे प्रकरण सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठापुढे आले. लेखी यांच्यातर्फे अ‍ॅड. मुकुल रोहटगी व राहुल गांधी यांच्यातर्फे अ‍ॅड. अभिषेक मनू सिंघवी यांचे म्हणणे ऐकल्यावर खंडपीठाने गांधी यांना ‘कन्टेम्प्ट’ची नोटीस जारी केली. राहुल गांधींवर ‘कन्टेम्प्ट’ची कारवाई व्हायला हवी, असा अग्रह धरताना अ‍ॅड. रोहटगी म्हणाले की, न्यायालयाच्या तोंडी चुकीचे वक्तव्य घातल्याची कबुली गांधी यांनी दिली आहे. त्यावेळी न्यायालयाचा निकाल वाचला नव्हता व जोशाच्या भरात ते वक्तव्य तोंडून निघाले, असे लंगडे समर्थन त्यांनी केले आहे.गांधी यांनी प्रतिज्ञापत्रात एकाच ठिकाणी ‘दिलगिरी’ शब्द कंसात वापरला आहे. ही दिलगिरी तोंडदेखली आहे, असे सांगत रोहटगी म्हणाले की, राहुल गांधी यांच्या ‘चौकीदार’ म्हणण्याचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे. ‘चौकीदार चौर है’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याचे ते सांगत फिरत आहेत. राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत कसे वागतो हेच यावरून दिसते. ते म्हणाले की, राफेल प्रकरणाच्या निकालात न्यायालयाने सरकारला ‘क्लीन चिट’ दिलेली नाही. तरीही भाजपचे नेते तसे सांगत आहेत; पण तेवढ्यावरून ‘कन्टेम्प्ट’ दाखल करण्यास आम्हाला वेळ नाही.काय म्हणाले न्यायालय?अ‍ॅड. सिंघवी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय ‘चौकीदार चौर है’ असे कधी म्हणेल याची कल्पनाही करता येणार नाही. ‘चौकीदार’ या शब्दाशी निगडित घोषणा गेल्या १८ महिन्यांत देशातील राजकारणात दोन्ही बाजूंकडून सातत्याने वापरल्या जात आहेत.‘चौकीदार चोर है’ या घोषणेवर राहुल गांधी ठाम आहेत. त्यांनी जी दिलगिरी व्यक्त केली आहे, ती फक्त ते शब्द न्यायालयाच्या तोंडी घातल्याबद्दल आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRafale Dealराफेल डीलSupreme Courtसर्वोच्च न्यायालय