शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 05:52 IST

मतुआ, मुस्लीमबहुल मतदार ठरणार ‘गेमचेंजर’

- याेगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्ककोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत दहा जागांवर मतदान झाले असून उर्वरित ३२ जागांवर निवडणूक शिल्लक आहे. बहुतांश जागांवर तृणमूल काँग्रेस व भाजप या दोन पक्षांमध्ये थेट लढत असली तरी काँग्रेस-डाव्यांच्या आघाडीने अनेक ठिकाणी आव्हान दिले आहे. अशा स्थितीत तृणमूलकडून स्थानिक मुद्द्यांवर जोर देत ‘बंगाली प्राईड’चा नारा देण्यात येत आहे. तर भाजपकडून विकास व अराजकतेच्या मुद्यावरच मत मागण्यात येत आहे.

रालोआने ४०० पारचा नारा दिला असल्याने बंगालमधून कमीत कमी २५ जागा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १९७१ नंतर बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत कुठल्याही राष्ट्रीय पक्षाने बहुमत मिळविलेले नाही. अशा स्थितीत भाजपच्या प्रत्येक रणनीतीवर तृणमूल व काँग्रेस-डाव्यांची बारीक नजर आहे. राज्यातील दक्षिण बंगाल भागात तृणमूलचे वर्चस्व असून तेथील १५ जागांवरदेखील विजय मिळविण्याचे तृणमूलचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय मुस्लिमबहुल मतदारसंघात सीएएच्या मुद्यावरून भाजपविरोधात जोरदार प्रचार सुरू आहे. 

चित्रपट कलाकार रिंगणातमतदारांना आकर्षित करण्यासाठी तृणमूलने सहा चित्रपट कलाकारांना रिंगणात उतरविले आहे. यात शत्रुघ्न सिन्हा, शताब्दी रॉय, रचना बॅनर्जी, दीपक अधिकारी, सायोनी घोष, जून मालिया यांचा समावेश आहे. तर भाजपने लॉकेट चॅटर्जी व हिरन चॅटर्जी यांना तिकीट दिले आहे. सीपीआय (एम)ने ओटीटीवरील लोकप्रिय चेहरा देवदत्त घोष यांना उमेदवारी दिली आहे

हिंसाचार प्रचाराचा मुद्दामागील काही आठवड्यात पश्चिम बंगालमधील विविध भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना झाल्या. संदेशखालीच्या मुद्यावरून भाजपने तृणमूलला टार्गेट केले होतेच. आता या घटनांनादेखील प्रचाराचा मुद्दा बनविण्यात आला आहे. 

राष्ट्रीय पातळीवर झालेला विकास, बंगालमधील गरिबांचे इतर राज्यांत स्थलांतर, राज्यातील बेरोजगारी व अराजकता या मुद्यांवर भाजपकडून मतं मागण्यात येत आहेत. मतुआ समाजाची मते मिळविण्यावर भाजपचा भर आहे. तर काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीकडून दोन्ही पक्षांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत उर्वरित ३२ मतदारसंघ पिंजून काढण्यात येत आहेत. 

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४