शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भुवनेश्वरमध्ये विद्यार्थीनीच आत्महत्या; विद्यापीठाने जबरदस्तीने विद्यार्थ्यांना पाठवले नेपाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 20:00 IST

भुवनेश्वर येथील एका खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे.

KIIT University Suicide Case: ओडिशातील भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी विद्यापीठात गोंधळ सुरू आहे.  मुलींच्या वसतिगृहात बीटेकच्या तृतीय वर्षाच्या एका विद्यार्थिनीने रविवारी सायंकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर काही तासांनी विद्यापीठाने सर्व नेपाळी विद्यार्थ्यांना तातडीने कॅम्पस रिकामे करण्याचे आदेश दिले. नेपाळी विद्यार्थ्यांना घाईघाईने सामान भरून तिकिटांशिवाय बस आणि ट्रेनमध्ये पाठवण्यात आले. विद्यापीठाच्या या कृतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ओडिशातील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील बी.टेकच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनीने तिच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. प्रकृती लमसाल असे नेपाळमधील विद्यार्थिनीचे नाव आहे. दुसरीकडे विद्यापीठाने नोटीस बजावत नेपाळमधील सर्व विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे म्हटलं. नेपाळमधील सर्व विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारी रोजी वसतिगृहे तातडीने रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर नेपाळी विद्यार्थ्यांना घाईघाईने त्यांचे सामान बांधण्यास भाग पाडले आणि त्यांना विद्यापीठाच्या बसमधून कटक रेल्वे स्थानकावर जबरदस्तीने पाठवण्यात आले.

त्यानंतर नेपाळी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनावर हे प्रकरण दडपल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाच्या  तपासात पारदर्शकता आणावी अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे, आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीच्या मित्रांनी आरोप केला की, तिचा माजी प्रियकर अद्विक श्रीवास्तवच्या छळामुळे तिने हे पाऊल उचलले. विद्यार्थिनीच्या भावानेही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त पिनाक मिश्रा म्हणाले की, एका विद्यार्थीनीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आम्ही इन्फोसिटी पोलीस ठाण्यात विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी विद्यार्थ्याचा मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर गॅजेट्स जप्त केले आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत."

दरम्यान, तणावामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीने विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाकडे मदत मागितली होती. परंतु कोणतीही मदत मिळाली नाही, असा आरोपही अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे. मानसिक दबावामुळे तिने हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सहकारी विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर विद्यापीठात प्रचंड निदर्शने सुरू झाली असून विद्यार्थ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

टॅग्स :Odishaओदिशाuniversityविद्यापीठCrime Newsगुन्हेगारीNepalनेपाळ