शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

विद्यार्थ्यांनी बंडखोरंच असायला हवं, त्याशिवाय बदल कसा घडणार - प्रकाश जावडेकर

By admin | Published: July 07, 2016 6:23 PM

भारतामध्ये शिक्षणामध्ये नावीन्य दिसत नाही कारण मुलांना प्रश्न विचारण्यापासून रोखलं जातं. ही प्रथा बंद व्हायला हवी असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारतामध्ये शिक्षणामध्ये नावीन्य दिसत नाही कारण मुलांना प्रश्न विचारण्यापासून रोखलं जातं. ही प्रथा बंद व्हायला हवी असं मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं असून नावीन्यासाठी बंडखोरीही आवश्यक असल्याचं ते गुरुवारी म्हणाले.
तुम्ही बंडखोर नसाल, आहे त्या परिस्थितीला बदलण्यासाठी आव्हान देत नसाल तर बदल कसा घडेल, नावीन्य कसं येईल असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. शिक्षणामध्ये बदल घडवण्याचं, नावीन्य आणण्याचं आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 
कुतूहल दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहन देत नाही, प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत नाही असं निरीक्षण जावडेकरांनी नोंदवलं आहे. मुलांना प्रश्न पडले पाहिजेत आणि त्यांनी ते विचारले पाहिजेत असंही जावडेकरांनी म्हटलं आहे.
जर मुलांमधलं कुतूहल जागृत केलं तर नावीन्य येईल आणि परीवर्तन घडेल असेही त्यांनी स्पष्ट केले. आनंद बाझार पत्रिकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 
टिकाऊ व शाश्वत विकास हा मोदी सरकारचा मंत्र असून तो निसर्गाची हेळसांड करत नसल्याचे जावडेकर म्हणाले. अर्थात, त्यासाठी नवनवीन प्रयोग आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं.
प्रसारमाध्यमांमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रानं क्रांती केली. नव्या कल्पना आल्या आणि बदल झाला असा दाखला त्यांनी दिला. स्टीव्ह जॉब्जनी 1990 मध्ये स्मार्ट फोनचं आणि त्याच्या विविध उपयोगांचं भाकीत केलं होतं याची आठवण जावडेकरांनी यावेळी करून दिली.