शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

भाऊ म्हणायचे मी आणखी १० वर्ष जगणार सुभाष चौधरी यांनी दिला आठवणींना उजाळा : लिस्टेरिया विकाराने केला मोठ्या भाऊंचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2016 12:22 AM

जळगाव : गांधी विचारच या जगाला युद्धापासून वाचविणार आहे. या विचारांच्या प्रचार व प्रसारासाठी त्यासाठी आपण किमान दहा वर्ष जगणार असल्याचा विश्वास भवरलाल जैन यांनी व्यक्त केला होता. मात्र लिस्टेरिया या घातक आजाराने त्यांचा घात केलाआणि ११ दिवसांच्या मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली.

जळगाव : गांधी विचारच या जगाला युद्धापासून वाचविणार आहे. या विचारांच्या प्रचार व प्रसारासाठी त्यासाठी आपण किमान दहा वर्ष जगणार असल्याचा विश्वास भवरलाल जैन यांनी व्यक्त केला होता. मात्र लिस्टेरिया या घातक आजाराने त्यांचा घात केलाआणि ११ दिवसांच्या मृत्यूशी सुरु असलेली झुंज संपली.
२७ जानेवारी रोजी मोठे भाऊ यांना चक्कर येऊन पहिला ॲटक आला. यावेळी विविध चाचण्या केल्यानंतर त्यांच्या डाव्या मेंदूला सुज आल्याचे निदान झाले. सर्वसाधारणपणे रक्तवाहिनी बंद पडल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. त्यानंतर त्यांना मुंबईला उपचारासाठी रवाना करण्यात आली. काही दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी उठतांना त्यांच्या पायाला त्रास होऊ लागला. आजारपणातून बरे झाल्यामुळे त्यांना त्रास होत असावा असे डॉक्टरांसह सर्वांनाच वाटले. तपासणी केल्यानंतर मात्र पायाच्या नसांमध्ये न्युरोपथी असल्याचे निदान झाले. औषधोपचारानंतरही प्रकृती खालावत असल्याने त्यांना १४ रोजी पुन्हा मुंबई येथे उपचारासाठी हलविण्यात आले. त्या दिवशी सकाळी ९ वाजता विमान तयार होते. मात्र त्या दिवशी मोठे भाऊ यांना मुंबईला जाण्याची इच्छा नव्हती. मात्र डॉ.सुभाष चौधरी व कुटुंबियांनी त्यांना समजावल्यानंतर दुपारी दोन वाजता त्यांना मुंबई येथे हलविण्यात आले.
मुंबईला उपचार सुरु असताना त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यावर डॉ.सुभाष चौधरी यांनी अतिदक्षता विभागात दाखल होण्याबाबत मोठ्या भाऊंना सांगितले. त्यांनी संमती दर्शविल्यानंतर सकाळी १० वाजता त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले.
१५ फेब्रुवारी रोजी रात्री त्यांना पुन्हा दोन झटके आल्याने ते बेशुद्ध पडले. त्यानंतर केलेल्या तपासणीत प्लेटलेट कमी झाल्याचे लक्षात आले. आजाराचे निदान करण्यासाठी तीन ठिकाणी रक्तांची चाचणी करण्यात आल्या. त्यात लिस्टेरिया या विकाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे डॉ.सुभाष चौधरी यांनी सांगितले. हा विकार मेंदूपर्यंत पोहचल्याने सेफ्टी सिमीया होऊन रक्तदाब कमी झाला. १५ फेब्रुवारीनंतर ते बेशुद्ध झाले ते शेवटपर्यंत शुद्धीवर आले नाहीत. लिस्टेरिया या आजारावरील उपचार सुरु असताना तज्ज्ञ डॉक्टरांचे स्वतंत्र पथक हे अमेरिका, लंडन यासह विविध देशातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या संपर्कात होते. मात्र शरीर साथ देत नसल्याने ते बेशुद्धावस्थेत होते.