शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

सुब्रमण्यम स्वामींनी NSA अजित डोवालना केले टार्गेट

By admin | Published: July 12, 2017 12:37 PM

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चहूबाजूंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 12 - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चहूबाजूंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका सुरु आहे. आता भाजपाचेच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एनएसए अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वामी यांच्या टि्वटवरुन त्यांचा रोख डोवाल यांच्याकडे असल्याचे दिसत आहे. 25 जूनलाच दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती सरकारला मिळाली होती. मग या हल्ल्यासाठी नोकरशाहीमध्ये कोणाला जबाबदार धरणार ? असा सवाल टि्वटमधून विचारला आहे. 
 
जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांच्या पत्राच्या आधारे स्वामींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. मुनीर खान यांनी दहशतवादी अमरनाथ यात्रेकरुंना लक्ष्य करु शकतात असे लष्कर, सीआरपीएफला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. जवळपास 15 दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला अमरनाथ यात्रेला धोका असल्याचा अलर्ट दिला होता. संध्याकाळच्या वेळेस बसेसची वाहतूक थांबवून हल्ला टाळता येणं शक्य होतं. 25 जून रोजी चंदिगड येथे जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि गुप्तचर खात्याच्या अधिका-यांची एक बैठक पार पडली होती. 
 
आणखी वाचा 
अमरनाथ यात्रा, गुप्तचर यंत्रणांनी 15 दिवसांपूर्वीच दिला होता हल्ल्याचा इशारा
भारताच्या जेम्स बॉण्डला हटवण्यासाठी #SackDoval ट्रेंड
अमरनाथ यात्रेतील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत
 
या बैठकीत अमरनाथ यात्रेकरुंवर होणा-या हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. आज स्वामींनी जो प्रश्न विचारलाय तोच प्रश्न काल काँग्रेसने विचारला होता. हल्ल्याची आगाऊ माहिती होती मग हल्ला रोखण्यासाठी वेळीच पावले का नाही उचलली ? असा सवाल सरकारला विचारण्यात आला होता. स्वामी यांनी यापूर्वी सुद्धा अजित डोवाल यांना टार्गेट केले आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीसाठी अजित डोवाल यांना जबाबदार धरले होते. 
 
अजित डोवाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीय वर्तुळात त्यांचा समावेश होतो. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यानंतर स्वामींनी राज्यातील सरकार बर्खास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार आहे. दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले.