शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Subramanian Swamy: 26/11 दहशतवादी हल्ल्यावर सुब्रमण्यम स्वामींचा खळबळजनक दावा; सूत्रधाराचे सांगितले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 20:07 IST

Subramaniam Swamy on 26/11 terror attack Mumbai: गुरुवारी या दहशतवादी हल्ल्यांमागे कोणाचे कारस्थान होते, याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सर्वांना माहिती आहे.

नवी दिल्ली : भाजप नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मुंबईत २००८ साली झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. गुरुवारी या दहशतवादी हल्ल्यांमागे कोणाचे कारस्थान होते, याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे. 

स्वामींनी ट्विट केले की, 'हे धक्कादायक आहे. २६/११ च्या हल्ल्याच्या वेळी यूपीए सरकारमध्ये गृह मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी राहिलेले आरव्हीएस मणी यांनी उघडपणे पाकिस्तानी अजमल कसाब आणि दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यादरम्यान पडद्यामागे काय घडले होते ते सांगितले आहे. हे टीडीकेसह पाकिस्तानचे कृत्य होते.

मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे सर्वांना माहिती आहे. मात्र, टीडीकेचे नाव लिहून स्वामींनी अखेर कोणावर निशाना साधला हे स्पष्ट झालेले नाही. स्वामी यांनी ज्या मणी यांचे नाव घेतले आहे, त्यांनी मुंबई हल्ल्याबाबत युपीए सरकारने घेतलेल्या भूमिकांवर या आधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. दोन वर्षांपूर्वी मणी यांनी हा हल्ला पाकिस्तान आणि तेव्हाच्या युपीए सरकारमधील फिक्स मॅच होती असा आरोप केला आहे. 

लोकसभेचे अधिवेशन सुरु झाले आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांनी युपीए अस्तित्वात नसल्याचे वक्तव्य केल्याने देशातील विरोधकांमध्ये वाक् युद्ध सुरु झाले आहे. स्वामींनी पुढे म्हटले की, देशहिताचे कारण देत राज्यसभा सचिवालयाने हा प्रश्न राज्यसभेत विचारण्याची परवानगी दिली जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. 

याचबरोबर चीनच्या सैन्याने लडाखमध्ये एलएसी पार केलेली का, हा प्रश्न विचारण्यास परवानगी दिली नसल्याचेही ते म्हणाले. यासाठी देशासाठी महत्वाचा प्रश्न असल्याचे कारण देण्यात आल्याचे स्वामी म्हणाले.  

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामी26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान