शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

फळे, भाज्या वाहतूक, साठवणीसाठी सबसिडी; महाराष्ट्रात खाद्यान्न प्रक्रियेची साखळी उभारणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 05:59 IST

शेतकऱ्यांवर कवडीमाेल भावात फळे आणि भाजीपाल्याची विक्री करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सवलत देण्यात येत आहे.

नितिन अग्रवाल, लाेकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : केंद्र सरकारने काेराेना आणि लाॅकडाऊनच्या नावाखाली रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. खाद्यान्न पुरावठा मंत्रालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन ग्रीन्स’ अंतर्गत आतापर्यंत १९४ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांवर कवडीमाेल भावात फळे आणि भाजीपाल्याची विक्री करण्याची वेळ येऊ नये, यासाठी सवलत देण्यात येत आहे. त्यानुसार, बटाटे, टाेमॅटाे, कांदा यासारख्या अधिसूचित भाज्या आणि फळांची वाहतूक आणि साठवणीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत आहे. ही याेजना नाेव्हेंबर २०१८ मध्ये सुरू झाली हाेती. त्यानंतर मे २०२० मध्ये याेजनेची व्याप्ती वाढवून आणखी भाज्या आणि फळांचा समावेश अधिसूचित  करण्यात आला.

मालवाहतूक आणि साठवणुकीसाठी अनुदानाचा दावा करणारे शेतकरी आणि संस्थांसाठी ऑनलाइन पाेर्टल सुरू करण्यात आले आहे. देशभरात किसान रेल्वेद्वारे २०२१च्या अखेरपर्यंत या याेजनेतून ५.९८ लाख मेट्रिक टन भाजीपाला आणि फळांची वाहतूक करण्यात आली.  त्यावर अनुदानापाेटी १९४.३४ काेटी रुपये देण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये सफरचंदाची वाहतूक आणि साठवणुकीसाठी नाफेडच्या माध्यमातून ७ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात आले.

महाराष्ट्रात खाद्यान्न प्रक्रियेची साखळी उभारणार

मजाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये खाद्यान्न प्रक्रियेची साखळी विकसित करण्यासाठी ४० वेअर हाऊस मंजूर करण्यात आले आहेत. त्यांची एकूण क्षमता ४६ हजार ३८० मेट्रिक टन एवढी आहे. त्यासाठी ३६३.३० काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून १३६.८२ काेटी रुपयांचे अनुदान देण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेMaharashtraमहाराष्ट्र