शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कौतुकास्पद! कधी भाजी विकली तर कधी रिक्षा चालवली; आज आहे करोडोंच्या कंपनीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2023 11:05 IST

'आर्य गो कॅब सर्व्हिस'चे मालक दिलखुश कुमार यांनी कठोर परिश्रमानंतर समाजात स्वतःची ओळख निर्माण केली, त्याचबरोबर अनेकांना रोजगार दिला.

कोणालाही एका रात्रीत किंवा अचानक यश मिळत नाही, त्यामागे अहोरात्र मेहनत आणि समर्पण असते. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. कधी रस्त्यावर भाजी विकणाऱा तर कधी रिक्षा चालवणारा व्यक्ती कोट्यवधींच्या कंपनीचा मालक झाला आहे. 'आर्य गो कॅब सर्व्हिस'चे मालक दिलखुश कुमार यांनी कठोर परिश्रमानंतर समाजात स्वतःची ओळख निर्माण केली, त्याचबरोबर अनेकांना रोजगार दिला.

दिलखुश कुमार हे सुरुवातीला गाडी चालवली. त्यांचे वडीलही बिहारमध्ये बसचालक होते. पाटणा येथे शिपायाच्या नोकरीसाठी त्यांनी मुलाखत दिली होती, मात्र तिथे त्यांना रिजेक्ट करण्यात आले. यानंतर त्यांनी नोकरीसाठी दिल्ली गाठली. मात्र, येथेही ते अपयशी ठरले. कोणत्याही कार मालकाने त्यांना त्यांची कार चालवू दिली नाही. यानंतर त्यांनी रिक्षा चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

फटाक्यांच्या दुकानात काम केले

रिक्षा चालवल्यानंतर काही दिवसांनी दिलखुशची तब्येत बिघडली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला परत बोलावले. यानंतर त्यांनी पाटणा येथे फटाक्यांच्या दुकानात काम केले आणि मारुती 800 चालविण्याची नोकरीही मिळवली. दिलखुशच्या वडिलांनाही खूप कमी पगार मिळायचा. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचं शिक्षण चांगलं होऊ शकलं नाही. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी लग्नही झाले होते.

जवळपास 500 लोकांना रोजगार

दिलखुश यांनी 2016 मध्ये त्यांची AryaGo कंपनी स्थापन केली. याशिवाय त्यांनी रॉडबेझ नावाची कॅब कंपनीही स्थापन केली आहे. आज त्यांच्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये सुमारे 4000 कार आहेत. या माध्यमातून ते जवळपास 500 लोकांना रोजगार देत आहेत. 29 वर्षांचे दिलखुश आज अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. सध्या त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी