शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
आजचे राशीभविष्य ११ ऑक्टोबर २०२४; या राशीला मोठा आर्थिक लाभ, इतरांनी...
3
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
4
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
5
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
6
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
7
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
8
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
9
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
10
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
11
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
12
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
13
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
14
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
15
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
16
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
17
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
18
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
19
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
20
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा

राजौरीमध्ये भारतीय लष्कराने असा उधळला आत्मघाती हल्ला, अन्यथा झाली असती उरीची पुनरावृत्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:01 AM

Indian Army: जम्मूमधील राजौरी जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या एका तळावर गुरुवारी पहाटे झालेला आत्मघातकी हल्ला जवानांनी शौर्याची पराकाष्ठा करत उधळून लावला.

जम्मू - जम्मूमधील राजौरी जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या एका तळावर गुरुवारी पहाटे झालेला आत्मघातकी हल्ला जवानांनी शौर्याची पराकाष्ठा करत उधळून लावला. जर दहशतवादी आपल्या इराद्यांमध्ये यशस्वी झाले असते तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. मात्र या दहशतवादी हल्ल्यात सहा जवान जखमी झाले. त्यापैकी तीन जणांना हौतात्म्य आले. दरम्यान, जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना चार तास चाललेल्या एन्काऊंटरनंतर कंठस्नान घातले.

याबाबत अधित माहिती देताना पीआरओ (संरक्षण) जम्मू लेफ्टिनेंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितले की, राजौरीमधील परघल येथे लष्कराच्या चौकीमधील सतर्क सुरक्षा रक्षकांनी आत्मघातकी हल्ला उधळून लावला. यापूर्वी १४ फेब्रुवारी २०१९ कोजी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाले होते. 

कर्नल आनंद यांनी सांगितले की, खराब हवामान आणि हिरवळीचा फायदा घेत दोन संशयित लष्कराच्या चौकीजवळ पोहोचले होते. मात्र सतर्क असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना येण्याचे कारण विचारले. मात्र या दोघांनी आत घुसण्याचा प्रयत्न केला. तसेच ग्रेनेड फेकले. यादरम्यान, सुरक्षा रक्षक आणि सैनिकांनी घेराव घातला आणि दहशतवाद्यांना पुकारले. यावेळी झालेल्या चकमकीत दोन्ही दहशतवादी ठार झाले. मात्र या चकमकीत सुभेदार राजेंद्र प्रसाद (राजस्थान), रायफलमॅन लक्ष्मण डी. (तामिळनाडू) आणि रायफलमॅन मनोज कुमार (हरियाणा) यांना वीरमरण आले.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीर