शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

सूधा मुर्ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर, हूमायूं आणि कर्णावतीच्या गोष्टीने नवा वाद; पाहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 6:45 PM

रक्षाबंधन सणाची सुरुवात मुघल सम्राट हुमायून आणि राणी कर्णावतीमुळे झाल्याचे सुधा मूर्ती यांनी म्हटले आहे.

Sudha Murty : राज्यसभा खासदार सुधा मूर्ती (Sudha Murty) नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात त्यांनी मुघल सम्राट हुमायून आणि चित्तोडच्या राणी कर्णावती यांची गोष्ट सांगितली आहे. या व्हिडिओमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. नेटीझन्स सुधा मूर्तींना या व्हिडिओमुळे प्रचंड ट्रोल करत आहेत.

पोस्टमध्ये नेमके काय आहे?सुधा मूर्ती यांनी रक्षाबंधन सुरू करण्यामागे मुघल सम्राट हुमायून आणि राणी कर्णावती असल्याचे म्हटले. सुधा मूर्ती त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहितात, "16 व्या शतकात राणी कर्णावती संकटात होत्या, तेव्हा त्यांनी मदतीसाठी मुघल सम्राट हुमायूंकडे एक धागा पाठवला होता. येथूनच राखी पाठवण्याची परंपरा सुरू झाली आणि ती आजही सुरू आहे." या पोस्टमुळे सोशल मीडिया यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.

सुधा मूर्तींनी सांगितली ती गोष्ट...सुधा मूर्तींनी या पोस्टमध्ये एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे. त्या म्हणतात की, "रक्षाबंधन हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा सण आहे. एक बहीण तिच्या भावाला रक्षासूत्र बांधते. आपल्या अडचणीच्या काळात भाऊ मदतीसाठी यावा, यासाठी हा धागा बांधला जातो. आपण इतिहासात डोकावून बघितले, तर जेव्हा राणी कर्णावतीच्या राज्यावर दुसऱ्याने आक्रमण केले होते, तेव्हा तिने मुघल सम्राट हुमायूनला धागा पाठवून रक्षण करण्याची विनंती केली होती."

"हुमायून दुसऱ्या देशातून आलेला असल्याने त्याला या धाग्याचा आणि संदेशाचा अर्थ समजला नाही. मग त्याने आपल्या लोकांना याबद्दल विचारले. त्याच्या लोकांनी हुमायूनला सांगितले की, हा बहिणीचा भावाला आलेला संदेश आहे.  जेव्हा हुमायूला याचा अर्थ कळला, तेव्हा त्याने कर्णावतीच्या रक्षणासाठी ताबडतोब दिल्ली सोडली. पण त्याला तिथे पोहोचायला थोडा वेळ लागला, तोपर्यंत राणी कर्णावती मरण पावली होती. पण या कथेतून आपल्याला शिकायला मिळालेला धडा म्हणजे, बहीण अडचणीत असेल, तर ती आपल्या भावाला धागा पाठवून मदतीसाठी बोलावू शकते," अशी माहिती सुधा मूर्तांनी या व्हिडिओतून दिली. 

नेटकऱ्यांनी धरले धारेवर...सुधा मूर्तींच्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. नेटकरी म्हणाले की, रक्षाबंधनाची सुरुवात महाभारत काळापासून झाली आहे. कृष्ण आणि द्रौपदी चांगले मित्र होते. युद्धात कृष्णाचे बोट कापले गेले, तेव्हा द्रौपदीने तिची साडी फाडून कृष्णाच्या बोटावर बांधली. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिला आपली बहीण मानले आणि तिचे रक्षण करण्याचे वचन दिले. महाभारत युद्ध झाले, तेव्हा युद्धात जाण्यापूर्वी द्रौपदीने कृष्णाच्या मनगटावर राखी बांधली होती. 

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनSudha Murtyसुधा मूर्तीSocial Viralसोशल व्हायरल