शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'सोमनाथ मंदिराच्या सोहळ्यात नेहरू आले नव्हते', BJP नेत्याने काँग्रेसच्या बहिष्कारांची यादीच वाचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 14:58 IST

BJP Press conference: काँग्रेसने राम मंदिर सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यावरुन भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी जोरदार हल्लाबोल केला.

BJP Questions Congress Boycott Politics: अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन आणि रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काँग्रेसने (Congress) बहिष्कार टाकला आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी गुरुवारी (11 जानेवारी) काँग्रेसने बहिष्कार टाकलेल्या सर्व कार्यक्रमांची यादीच वाचली. त्रिवेदी म्हणाले की, 'काँग्रेसवाले नेहमी नकारात्मक राजकारण करतात आणि प्रत्येक गोष्टीवर बहिष्कार टाकतात. त्यामुळेच देशातील जनतेनेही काँग्रेसवर बहिष्कार टाकला आहे. भारताचा इतिहास पाहिला तर कॉंग्रेसने प्रत्येक चांगल्या गोष्टींवर बहिष्कार टाककला आहे.'

'काँग्रेसच्या काळात अनेक घटना घडल्या'काँग्रेस पक्षाच्या इतिहासाचा संदर्भ देत सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, 'इंदिरा गांधींच्या काळात कारसेवकांवर गोळ्या झाडल्या गेल्या. राजीव गांधी आणि पीव्ही नरसिंहराव यांच्या काळात तर काय नाही ते घडले आणि सोनिया गांधींच्या काळात तर चक्क राम काल्पनिक झाले. हीच काँग्रेसची संस्कृती आहे आणि राम मंदिराला विरोध, हाही त्याचाच एक भाग आहे. बाबरीचे समर्थक राम मंदिराच्या कार्यक्रमात येत आहेत, पण काँग्रेसवाले विरोध करत आहेत.'

'सोमनाथ मंदिरात नेहरू उपस्थित नव्हते''सोमनाथ मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू होता, तेव्हा जवाहरलाल नेहरुंनी 24 एप्रिल 1951 रोजी तत्कालीन सौराष्ट्र प्रमुखांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात नेहरु म्हणाले की, या कठीण काळात हा सोहळा होतोय, यासाठी मी दिल्लीहून येऊ शकत नाही. या सोहळ्यामुळे मला खूप त्रास झाला आहे. माझ्यासाठी हे खूप वेदनादायक आहे की, राष्ट्रपती, माझे काही मंत्री आणि तुम्ही या सोहळ्यात उपस्थित आहात. मला वाटते की हे माझ्या देशाच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे. याचे परिणाम चांगले होणार नाहीत, असे नेहरुंनी पत्रात म्हटल्याचे त्रिवेदी म्हणाले.

'नवीन संसद भवन, अभिभाषण, कारगिलवर बहिष्कार टाकला'त्रिवेदी पुढे म्हणाले की, 'काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला होता. जीएसटी लागू झाला तेव्हाही बहिष्कार टाकला. जी-20 दरम्यान जगातील 20 शक्तिशाली देशांचे राष्ट्रप्रमुख आले होते. यावेळी राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या भोजनाच्या कार्यक्रमावरही कॉंग्रेसने बहिष्कार टाकला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि आता द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरही काँग्रेसने बहिष्कार टाकला. 2004 नंतर 2009 पर्यंत काँग्रेसने कारगिल विजय दिवसावर बहिष्कार टाकला.'

'अणुचाचणीवर मौन, प्रणव मुखर्जींच्या सन्मानावरही बहिष्कार''मे 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पोखरण अणुचाचणीनंतर काँग्रेसने 10 दिवस कोणतेही वक्तव्य केले नाही. इतकंच काय, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भारतरत्न समारंभावरही काँग्रेसने बहिष्कार टाकला होता. प्रणव मुखर्जी त्यांच्याच पक्षाचे होते ना? आता काही ठराविक लोकांच्या मतांसाठी काँग्रेस राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आहे. काँग्रेसने राम मंदिरावर बहिष्कार टाकला, त्यामुळे आता जनता त्यांच्यावर बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही,' अशी टीका त्रिवेदी यांनी केली.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याUttar Pradeshउत्तर प्रदेशJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी