शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
3
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
4
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
5
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
6
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
7
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
8
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
9
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
10
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
11
मर्डर मिस्ट्री! विम्याचे पैसे हडपण्यासाठी बायकोचा काढला काटा; 'असा' रचला भयंकर कट
12
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!
13
महायुतीचा प्लॅन! पुन्हा सत्तेत येण्याची रणनीती; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, आता...
14
पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना
15
"शेतकऱ्यांच्या मुलांची परिस्थिती बिकट, हेच त्यांनी..."; अजितदादांच्या आमदाराने देवेंद्र भुयारांची घेतली बाजू
16
Navratri 2024: नैवेद्यात ठेवा रोजचेच स्वयंपाक घरातले 'हे' जिन्नस, तरीही होईल देवीची कृपा!
17
माटुंग्यातल्या व्यापाऱ्याने अटल सेतूवरुन मारली उडी; पोलिसांना सापडला मृतदेह
18
वोटिंगनुसार 'हाच' विजेता, पण गेमनुसार... Bigg Boss Marathi 5 बद्दल शिव ठाकरेचा खुलासा
19
Navratri 2024: नवरात्रीत देवी भागवत पारायण केल्याने मिळते शेकडो पटीने पुण्य!
20
नवरात्र: तुमची रास कोणती? विशेष पूजा अन् नवदुर्गांना ‘हा’ नैवेद्य अर्पण करा; भरभराट होईल

देशात २६० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2020 10:30 PM

उत्तरप्रदेश यंदाही साखर साखर उत्पादनात अव्वल

ठळक मुद्देगेल्यावर्षी देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन : ७० लाख टनांनी होणार घट

पुणे : अतिवृष्टी, गेल्यावर्षीचा दुष्काळ याचा फटका यंदाच्या ऊस गाळप हंगामावर झाला असून, देशातील साखर उत्पादनात यंदा २६० लाख टनांपर्यंत घट होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ७० लाख टनांनी साखर उत्पादन घटणार असल्याचा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) वर्तविला आहे. गेल्यावर्षी देशात ३३० लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यातील,उत्तरप्रदेशामधे १२० व महाराष्ट्रात १०७ लाख टन साखर उत्पादित झाली होती. यंदा महाराष्ट्र व कर्नाटकातील ऊस गाळप हंगामाला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील साखर उत्पादन यंदा निम्म्याने खाली येणार आहे. देशातील ४४६ साखर कारखान्यांनी जानेवारी-२०२० अखेरीस १४१.१२ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी याच काळामधे ५२० साखर कारखान्यांनी १८५.५९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. यंदाच्या हंगामात देशामधे २६० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. उसाच्या रसापासून आणि बी हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीमुळे साडेआठ लाख साखरेची घट होईल. गेल्या वर्षीपेक्षा ७० लाख टनांनी साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे. जानेवारी २०१९च्या तुलनेत यंदा ४४.५ लाख टन साखर उत्पादन घटले आहे. उत्तरप्रदेशमधे यंदाही सर्वाधिक साखर उत्पादित होईल. येथील ११९ साखर कारखान्यांनी ५४.९६ लाख टन साखर ३१ जानेवारी २०२० पर्यंत उत्पादित केली होती. गेल्यावर्षी याच काळामधे ११७ कारखान्यांनी ५२.८६ साख टन साखरेचे उत्पादन घेतले होते. महाराष्ट्रातील १४३ कारखान्यांनी ३४.६४ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्यावर्षी याच काळामधे महाराष्ट्रात ७१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. कर्नाटकामधील ६३ कारखान्यांनी २७.९४ लाख टन साखर उत्पादित केली असून, गेल्यावर्षी ३३.७६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. तमिळनाडूमधे २१ कारखान्यांनी २.०५, गुजरात मधील १५ कारखान्यांनी ४.८७, आंध्रप्रदेश व तेलंगणातील १८ साखर कारखान्यांनी २.३४ लाख टन साखर उत्पादित केली आहे. बिहारमधे ४.२१, उत्तराखंड १.९४, पंजाब ३, हरयाणा २.८०, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधे २.२६ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. --देशात २६० लाख टन साखर विक्रीचा अंदाजदेशामधे गेल्यावर्षी सुमारे २५५ लाख टन साखर विक्री झाली होती. या वर्षी २६० लाख टन साखरेची देशांतर्गत विक्री होईल, असा अंदाज इस्माने वर्तविला आहे. हंगाम सुरु होण्यापूर्वी देशात आॅक्टोबर २०१९ रोजी १४४.३ लाख टन, तर राज्यात ५४.७ लाख टन साखर शिल्लक होती. त्यामुळे यंदा साखरेच्या उत्पादनात घट झाली तरी, मागणीच्या तुलनेत अधिकच साखर उपलब्ध राहील. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकारUttar Pradeshउत्तर प्रदेश